AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता माझ्या मुलाचाही बदला घेऊ का?; रावसाहेब दानवे असं का म्हणाले?

आता भाजप नेते आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी मोठं वक्तव्य केले. रावसाहेब दानवे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पराभवबद्दल भाष्य केले.

आता माझ्या मुलाचाही बदला घेऊ का?; रावसाहेब दानवे असं का म्हणाले?
| Updated on: Sep 03, 2024 | 3:13 PM
Share

Raosaheb Danve on Jalna loksabha constituency : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच नेते, पदाधिकारी मतदारसंघांची चाचपणी करत आहे. तसेच महायुती आणि महाविकासआघाडीत विधानसभेच्या जागावाटपाची चर्चा सुरु आहे. त्यातच आता भाजप नेते आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी मोठं वक्तव्य केले. रावसाहेब दानवे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पराभवबद्दल भाष्य केले.

जालना लोकसभा मतदारसंघात भाजपाचे रावसाहेब दानवे हे सलग पाच वेळा निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध कॉग्रेसचे डॉ.कल्याण काळे हे मैदानात उतरले. या मतदारसंघावर दानवेंची मजबूत पकड समजली जात होती. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांना अटीतटीची लढत दिली होती. त्या निवडणुकीत दानवे यांनी काळे यांचा 8 हजारापेक्षा अधिक मतांनी पराभव केला होता. आता यंदाच्या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांना पराभवाचा सामना करावा लागला.

रावसाहेब दानवे यांचा एक लाख मतांच्या फरकाने पराभव झाला. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनाचा प्रभाव जालन्याच्या निवडणुकीवर दिसून आला. यानंतर आता रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या पराभवाची कारणं सांगितली आहेत. माझ्या मुलाच्या मतदारसंघातदेखील मला कमी लीड मिळाले, मग मी आता त्याचाही बदला घेऊ का, असा सवाल रावसाहेब दानवे यांनी विचारला.

रावसाहेब दानवे नेमकं काय म्हणाले?

“माझा पराभव हा एखाद्या व्यक्तीमुळे झालेला नाही. माझ्या मुलाच्या मतदारसंघातही मला लीड मिळाली नाही. मग त्यात माझ्या मुलाने काम केलं नाही असं मी म्हणू का? किंवा मी आता त्याचाही बदला घेऊ का?” असे रावसाहेब दानवे म्हणाले. “माझा पराभव जनमतामुळे झाला आहे. त्यामुळे यात कोणालाही दोष देता येणार नाही”, असे रावसाहेब दानवेंनी म्हटले. “राज्याच्या राजकीय वातावरणात अचानक बदल झाला आणि त्याचा फटका पक्षाला बसला”, असे दानवे म्हणाले.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.