AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uday Samant : अनंत गितेंचीच भूमिका एकनाथ शिंदे पुढे घेऊन जाताहेत, मग गितेही गद्दार का?; उदय सामंतांचा टोला

Uday Samant : सहा महिन्यांपूर्वी आम्ही गद्दार नव्हतो. गीते साहेबांची भूमिका आम्ही पुढे नेली. त्यामुळे आम्ही गद्दार झालो, असा चिमटाही सामंत यांनी काढला. 40 आमदार आम्ही शिवसेनेतच आहोत. काही लोक संभ्रम पसरवत आहेत.

Uday Samant : अनंत गितेंचीच भूमिका एकनाथ शिंदे पुढे घेऊन जाताहेत, मग गितेही गद्दार का?; उदय सामंतांचा टोला
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 25, 2022 | 3:21 PM
Share

रत्नागिरी: शिवसेनेचे नेते अनंत गिते (anant geete) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्या बंडावर टीका केली होती. त्यावर शिंदे गटाचे आमदार उदय सामंत (uday samant) यांनी पलटवार केला आहे. काही लोकांना व्यासपीठ मिळत नाही. त्यामुळे व्यासपीठ मिळाल्यावर ते टीका करू लागतात. गिते यांनीही त्याच पद्धतीने टीका केली आहे. सहा महिन्यापूर्वी गीते यांनी खेडला एक मेळावा घेतला होता. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना संपवत असल्याचा दावा केला आहोत. एवढेच नव्हे तर गीते यांनी शरद पवार यांच्याविषयी अपशब्द वापरला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवत आहे, असं सर्वात आधी गीतेंनीच सांगितलं. त्यांनीच सुरुवात केली. त्यांची ही भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेऊन जात आहे, असा पलटवार उदय सामंत यांनी सांगितलं. खेडमध्ये मेळावा घेऊन गीते यांनी राष्ट्रवादीविरोधात भूमिका घेतली होती. तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. मग गीते तेव्हा गद्दार होते का? असा खोचक सवालही सामंत यांनी केला.

उदय सामंत यांनी मीडियाशी संवाद साधताना अनंत गीते यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. सहा महिन्यांपूर्वी आम्ही गद्दार नव्हतो. गीते साहेबांची भूमिका आम्ही पुढे नेली. त्यामुळे आम्ही गद्दार झालो, असा चिमटाही सामंत यांनी काढला. 40 आमदार आम्ही शिवसेनेतच आहोत. काही लोक संभ्रम पसरवत आहेत. काही म्हणतात, आम्ही मनसेत, काही म्हणतात आम्ही प्रहारमध्ये जाणार. हा सर्व संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न आहे. पण आम्ही शिवसेनेतच आहोत. कुठेही गेलो नाही, असं त्यांनी सांगितलं. शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत राहू नये असं अनंत गीते म्हणायेच. त्यांनी ही भूमिका मांडली होती? याचे प्रामाणिक उत्तर त्यांनी द्यावं, असं आव्हानच त्यांनी दिलं.

योगेश कदमांचं खच्चीकरण करायचं नव्हतं

रत्नागिरीतल्या मेळाव्याला आम्ही महत्त्व देत नाहीत. योगेश कदम यांना ताकद द्यावी अशी सूचना देण्यात आली होती. त्यानंतर दीड महिन्यानंतर राष्ट्रवादी सोबत युती करायला पाहिजे अशा सूचना आल्या होत्या. योगेश कदम यांचे खच्चीकरण करण्याच्या माझ्या कुठल्या ही भावना नव्हत्या, असा खुलासाही त्यांनी केला.

आम्ही शिवसेनेतच

फारच निष्ठावंताचे वातावरण निर्माण केलं जातंय. काही दिवसात हेच लोक बाजूला झालेले दिसतील. आम्ही शिवसेनेत नसतो तर निवडणूक आयोगाकडे केस चालू झाली नसती. एकनाथ शिंदे आम्ही शिवसेनेत आहोत असंच सांगतायत, असंही ते म्हणाले.

सिंधुदुर्गापासून ते रत्नागिरीपर्यंतचे शिवसैनिक संपर्कात

माझ्या संपर्कात सिंधुदुर्गपासून रत्नागिरीपर्यत सर्व शिवसैनिक आहेत. शिवसेना ही एकसंघ आहे. गद्दार, बाडगा हे शब्द फेमस आहेत. हे शब्द वापरल्याशिवाय टाळ्या मिळत नाहीत, असं सांगतानाच उद्धव ठाकरे हे आमचे नेते आहेत आणि राहतील. 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत मला माझ्या मतदारांवर पूर्ण विश्वास आहे. कोण काय बोलतं याला मी किंमत देत नाही, असंही ते म्हणाले.

Follow Us
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा