AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saamana : जो जिता वोही सिंकदर या न्यायाने सिंकदरांचा जल्लोष सुरू, सामना अग्रलेखातून भाजपला टोला

राज्यसभेची निवडणुक जशी भाजपाला महत्त्वाची होती. तशीचं ती महाविकास आघाडीला देखील महत्त्वाची होती. महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचं जे काही चित्र रंगवलं जात आहे.

Saamana : जो जिता वोही सिंकदर या न्यायाने सिंकदरांचा जल्लोष सुरू, सामना अग्रलेखातून भाजपला टोला
जो जिता वोही सिंकदर या न्यायाने सिंकदरांचा जल्लोष सुरूImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 13, 2022 | 7:40 AM
Share

मुंबई : राज्यसभेचे मतदान (Voting) राजकीय पक्षांसाठी खुल्या पद्धतीने होते. तरीही जे व्हायचे होते ते झाले. म्हणजे घोडाबाजार झाला. आता विधानपरिषदेची निवडणुक होणार आहे. ती गुप्तपद्धतीने निवडणुक होणार आहे. त्यामुळे अनेकांना नव्याने कोंब फुटला आहे. निवडणुका जिंकण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा अशा पद्धतीने वापर व्हावा हे योग्य नाही. तसेच लोकशाहीसाठी चांगलं देखील नाही. राज्यसभेची सहावी जागा भाजपने (BJP) जिंकून दाखवली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन पण त्यामुळे आकाश कोसळलं आहे काय ? मुंगीने मेरू गिळला काय ? असे अजिबात झाले नाही अशी टीका आजच्या सामना (Saamana) अग्रलेखातून करण्यात आली आहे.

आमदारांची मतं मिळवून जिंकायचं आमचा प्लॅन होता

राज्यसभेची निवडणुक जशी भाजपाला महत्त्वाची होती. तशीचं ती महाविकास आघाडीला देखील महत्त्वाची होती. महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचं जे काही चित्र रंगवलं जात आहे. ते अत्यंत चुकीचं आहे, कारण आमच्यात असं काही नाही. चार पाच अपक्षांना हाताशी धरून आणि बहुजन विकास आघाडीच्या आमदारांची मतं मिळवून जिंकायचं आमचा प्लॅन होता. तसाच प्लॅन भाजपाचा देखील होता. राज्यसभेची सहावी जागा त्यांनी जिंकली. त्यामुळे ते जल्लोष करीत आहेत. जो जिता वोही सिंकदर या न्यायाने सिंकदरांचा जल्लोष व उत्सव सुरू आहे. निवडणूक जिंकल्याने त्यांनी काही मोठा चमत्कार घडविला आहे अशा पद्धतीने अंगारे-धुपारे फिरवले जात आहेत.

भाजपकडून चुकीच्या बातम्या पेरल्या जात आहेत

आजच्या सामानाच्या अग्रलेखात निवडणूकीत सहावी जागा जिंकल्यानंतर भाजपाने काय केल त्याचा ऊहापोह घेण्यात आला आहे. ज्या पद्धतीने भाजपकडून बातम्या पेरल्या जात आहेत. त्या अत्यंत चुकीच्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत गणिताचं चातुर्य दाखवलं. पण आमच्या आजही बहुमत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांनी अनिल देखमुख आणि नवाब मलिक यांनी मतदान करू दिलं नाही.

केंद्राच्या यंत्रणा चुकीच्या पद्धतीने वापरल्या जात आहेत अशी टीका देखील करण्यात आली आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.