AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वसामान्य जनतेसाठी नवा पक्ष काढणार, सदाभाऊ खोत यांची घोषणा

रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी नवा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला (Sadabhau Khot form new party) आहे. येत्या पाच फेब्रुवारीपासून सदाभाऊ खोत महाराष्ट्र दौरा करणार आहे.

सर्वसामान्य जनतेसाठी नवा पक्ष काढणार, सदाभाऊ खोत यांची घोषणा
| Updated on: Jan 18, 2020 | 6:57 PM
Share

औरंगाबाद : रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी नवा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला (Sadabhau Khot form new party) आहे. येत्या पाच फेब्रुवारीपासून सदाभाऊ खोत महाराष्ट्र दौरा करणार आहे. तसेच एप्रिलमध्ये पहिले अधिवेशन घेतलं जाणार आहे. नव्या पक्षाचा झेंडा आणि नाव जनतेतून आलं पाहिजे, म्हणूनच लोकांना नाव आणि झेंडा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुचवावं, असं आवाहन सदाभाऊ खोत यांनी केलं. औरंगाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतची माहिती (Sadabhau Khot form new party) दिली.

राजकारणापासून अलिप्त असलेले आणि सज्जन लोक पक्षात सामावून घेऊ. हा पक्ष सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी काम करेल. फडणवीस सरकारच्या काळात शेतकरी वंचित राहिला. आताच असो किंवा आधीच सरकार, शेतकरी कर्जमाफी देताना निकष न लावता कर्जमाफी केली पाहिजे होती, असं मत सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केलं.

निवडणुकीच्या काळात जे आश्वासन उमेदवार देतात ती शपथपत्र म्हणून घेतली पाहिजे. निवडून आल्यावर त्यांनी दिलेलं आश्वासन तीन महिन्यात पाळलं नाही, तर त्याच पद काढून घेण्यात यावं अशी भूमिका निवडणूक आयोगाने घ्यावी अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली. रयत क्रांती संघटनेचा निर्धार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात संघटनेची नव्याने उभारणी आणि त्याची वाटचाल याबाबत मंथन करण्यात आलं. आता आपल्याला संधी असल्याच यावेळी सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.

आज शरद जोशी यांची शेतकरी संघटना सोडली. तर शेतकऱ्यांसाठी झटणारे सर्व सत्ताधाऱ्यांसोबत गेल्याने रस्त्यावर उतरणारे आपण एकटेच असल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. आज आपल्यासोबत काम करणारा वर्ग शेतकरी आहे. दिवसभर काम केल्यावर आता रात्री आपल्या संघटनेसाठी काम करा. झेंडा आपला घ्या आणि त्याची काठी मात्र शेतकऱ्यांची घ्या. आपला प्रचार आणि प्रसार करा, असं आवाहन खोत यांनी पदाधिकाऱ्यांना केलं.

खर्च कमी करा, मेळाव्यात खाली टॉवेल टाकून आलेल्या कार्यकर्त्यांना मदतीचा आवाहन करा. कोणी दहा रुपये, कोणी वीस रुपये अशी मदत करेल. ती मदत आपल्या संघटनेच्या कामी येईल. आता विरोधी बाकावर बसून तुमचा आवाज म्हणून काम करणार आहे. ही संघटना घरच्या भाकरी खाऊन मोठी झाली ते सर्वाना कळलं पाहिजे. असं आवाहन सदाभाऊ खोत यांनी मेळाव्यात (Sadabhau Khot form new party) केलं.

Follow Us
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.