AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay kaka Patil : ..तर संजयकाकांच्या मुलाच्या लग्नात गोंधळ घालू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

तासगावच्या कारखान्याची बिलं अद्याप मिळालेली नाहीत. ती पूर्ण मिळायला हवी. तुम्ही तुमच्या मुलाचा विवाह थाटामाटात करणार आणि शेतकऱ्यांना उपाशी ठेवणार हे चालणार नाही, असा इशारा खराडे यांनी दिलाय.

Sanjay kaka Patil : ..तर संजयकाकांच्या मुलाच्या लग्नात गोंधळ घालू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा
संजयकाका पाटील, खासदार, भाजपImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 02, 2022 | 9:02 PM
Share

सांगली : भाजपचे खासदार संजयकाका पाटील (Sanjay Kaka Patil) यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालीय. संजयकाका पाटील यांनी शेतकऱ्यांची पूर्ण ऊसबिलं दिली नाहीत तर 14 मे रोजी संजयकाका पाटील यांच्या मुलाच्या लग्नात गोंधळ घालण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatna) जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिलाय. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या RRC कारवाईच्या आदेशानुसार विटा तहसीलदार ऋषिकेश शेळके यांच्या सहकार्यामुळे नागेवाडी कारखान्याची (Nagewadi Sugar Factory) थकीत 6 कोटीची ऊस बिले व्याजासहित शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग झाली. त्यामुळे स्वाभिमानीच्या वतीने तहसीलदार शेळके यांच सोमवारी सत्कार करण्यात आला.

’14 मे ला संजयकाकांच्या मुलाच्या लग्नात गोंधळ घालू’

नागेवाडी कारखान्याची बिले मिळणे हे स्वाभिमानीच्या आंदोलनाचे यश आहे. RRC कारवाईत 15 टक्के व्याजासहित बिले द्यावीच लागतात. ते शेतकऱ्यांवर मेहेरबानी करत नाहीत. तासगावची अर्धी बिले शेतकऱ्यांना मान्य नाहीत, पूर्ण बिले दिली नाहीत तर 14 मे रोजी खासदार संजयकाका पाटील यांच्या मुलाच्या विवाहात गोंधळ घालू असा इशारा खराडे यांनी दिला आहे.

मुलाचा विवाह थाटामाटात करणार आणि शेतकऱ्यांना उपाशी ठेवणार?

मागील वर्षभरापासून शेतकऱ्याच्या घरातील शुभ प्रसंग थांबले आहेत. त्यामुळे खासदार संजयकाका पाटील यांनी आमच्यावर ती वेळ येऊ देऊ नये. स्वाभिमानी वर्षभरापासून आंदोलन करत आहे. या आंदोलनाची दखल घेऊन साखर आयुक्तांनी RRC कारवाईचा आदेश दिलाय. स्वाभिमानीच्या अनेक आंदोलनानंतर 35 कोटी शेतकऱ्यांना मिळाले. तासगावच्या कारखान्याची बिलं अद्याप मिळालेली नाहीत. ती पूर्ण मिळायला हवी. तुम्ही तुमच्या मुलाचा विवाह थाटामाटात करणार आणि शेतकऱ्यांना उपाशी ठेवणार हे चालणार नाही, असा इशारा खराडे यांनी दिलाय.

..तर मुलाला शेतकरी 100 टक्के आशीर्वाद देतील

नागेवाडीच्या लिलावातील 9 कोटी रुपये तासगावच्या बिलासाठी मिळणार आहेत. उर्वरित जी रक्कम कमी पडेल त्याची संजयकाका पाटील यांनी तरदूद करावी आणि 100 टक्के बिलं द्यावीत म्हणजे मुलाला शेतकरी 100 टक्के आशीर्वाद देतील, असंही खराडे यावेळी म्हणाले.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.