AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : हरभरे टाकले की घोडे कुठेही जातात, संजय राऊत ‘दगाबाज’ अपक्षांवर बरसले

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : निवडणुकांमध्ये काही घोडे असतात. ते नेहमीच विकायला तयार असतात. यावेळी या घोड्यांची जास्त बोली लागलेली असेल. त्यामुळेच आम्हाला हक्काची सहा मते मिळाली नाहीत. असे लोक कुणाचेच नसतात.

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : हरभरे टाकले की घोडे कुठेही जातात, संजय राऊत 'दगाबाज' अपक्षांवर बरसले
हरभरे टाकले की घोडे कुठेही जातात, संजय राऊत 'दगाबाज' अपक्षांवर बरसलेImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 11, 2022 | 11:45 AM
Share

मुंबई: राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) शिवसेनेचे उमेदवार संजय पवार (sanjay pawar) यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) प्रचंड संतापले आहेत. राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधताना आपला संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी या पराभवाचे खापर थेट अपक्षांवरच फोडले. काही घोडे बाजारात नेहमीच असतात. हरभरे टाकले की ते कुठेही जातात. जिकडे हरभरे तिकडे घोडे असतात. अशाच काही घोड्यांनी दगाबाजी केली. त्यामुळे आमच्या उमेदवाराचा पराभव केला असं सांगतानाच दगाबाजी करणाऱ्या या आमदारांची यादी आमच्याकडे आहे. आम्ही त्यांना पाहून घेऊ, असा इशाराही राऊत यांनी दिला. आघाडीसोबत असलेल्या अपक्षांची मते फुटली असली तरी आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. घोडेबाजारातील घोड्यांमुळे कोणताही परिणाम होत नाही. विशेषत: महाराष्ट्रात घोडे तिकडे असतील किंवा इकडे असतील… हरभरे टाकले की ते कुठेही जातात, असा हल्लाबोलही राऊत यांनी केला.

निवडणुकांमध्ये काही घोडे असतात. ते नेहमीच विकायला तयार असतात. यावेळी या घोड्यांची जास्त बोली लागलेली असेल. त्यामुळेच आम्हाला हक्काची सहा मते मिळाली नाहीत. असे लोक कुणाचेच नसतात. अर्थात ज्या कुणीही शब्द देऊन दगाबाजी केली आहे. त्यांची यादी आमच्याकडे आहे. त्यांची नावं आमच्याकडे आहेत. कुणी मते दिले नाही हे आम्ही माहीत आहे, असा सूचक इशारा संजय राऊत यांनी दिला.

आम्ही व्यापारात पडलो नाही

जे घटक पक्ष आहेत. छोटे पक्ष आहेत, जे शिवसेना किंवा आघाडीबरोबर आहेत. त्यांचं एकही मत फुटलं नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, बच्चू कडू, गडाख, यड्रावकर आणि इतरांची सर्व मते आम्हाला मिळाली आहेत. फक्त घोडेबाजारात जे उभे होते त्यांचे सहा सात मते पडली नाही. आम्ही कोणत्याही व्यवहारात पडलो नाही. व्यापार केला नाही. तरीही आम्हाला 33 मते मिळाली हा आमचा विजय आहे. असा दावाही त्यांनी केला. तसेच हरभऱ्याच्या झाडावर चढू नका. हरभरे काही अपक्षांनी खाल्ले आहेत, तुम्ही हरभऱ्याच्या झाडावर चढू नका, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

दैदिप्यमान विजय नाही

आमचा उमेदवार विजयी होऊ शकला नाही, याचा अर्थ असा नाही की कोणी तरी दैदिप्यमान विजय मिळवला. असं नाही. ठिक आहे. भाजपने एक जागा जिंकली. पहिल्या क्रमांकाची 33 मते आम्हाला मिळाली आहेत. 27 मते भाजपला मिळाली. तसे म्हटलं तर 33 आणि 27 मध्ये फरक आहे. पण निवडणूक प्रक्रिया वेगळी असते. पहिल्या पसंतीचे दुसऱ्या पसंतीचे मते पाहिली जातात, असंही त्यांनी सांगितलं.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...