AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut: भाजपने मेलेल्या गायीच्या टाळूवरचं लोणी खाल्लं, 100 कोटींचा घोटाळा; संजय राऊत यांचा नवा बॉम्ब

आज खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी भाजपने मेलेल्या गायीच्या टाळूवरचं लोणी खाल्लं असे म्हटले आहे.

Sanjay Raut: भाजपने मेलेल्या गायीच्या टाळूवरचं लोणी खाल्लं, 100 कोटींचा घोटाळा; संजय राऊत यांचा नवा बॉम्ब
Sanjay-RautImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 12, 2026 | 10:46 AM
Share

सध्या राज्याच्या राजकारणात सतत काही ना काही घडामोडी घडत असल्याचे दिसत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्यानंतर 14 आमदार शिंदे सेनेत जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यानंतर राम मंदिरातील दानपेटीचा घोटाळा समोर आला. आता या सर्वावर खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतल वक्तव्य केले. त्यात त्यांनी १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा उल्लेख करत भाजपवर निशाणा साधला आहे. ते नेमकं काय म्हणाले? वाचा…

सीसीटीव्ही कॅमेऱ्यापासून भ्रष्टाचार

पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले, सीसीटीव्ही कॅमेऱ्यापासून भ्रष्टाचार आहे. रस्ते सोडून द्या. साडे तीनशे कोटीचा भ्रष्टाचार आहे. मी लवकरच देणार आहे. हिंदुधर्माच्या नावाने पैसा खात आहे. राम मंदिरापासून काळाराम मंदिरापासून. लाज वाटली पाहिजे. चंपत राय अयोध्येत नसून भाजपचं जिथे जिथे राज्य आहे, तिथे असे चंपत राय आहेत.

१०० गोशाला बोगस

पुढे ते म्हणाले, राजस्थानात गोशालांना अनुदान मिळते. १०० गोशाला बोगस आहे. मेलेल्या गायींवरही अनुदान घेतलं. भाजपने. भाजपचं राज्य असलेल्या राजस्थानमध्ये हे चाललं आहे. गोवंश हत्याबंदीचे कायदे आणता. त्यासाठी लिंचिंग करता. आणि मृत गोमातेच्या टाळूवरचं तुम्ही लोणी खाता. १०० कोटींचं अनुदान लाटता. मोदी, भागवत, दत्तात्रय होसबळे काय करत आहेत. हिंदुत्वाच्या नावाने लूट सुरू झाली आहे. श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या नावाने या गोशाला आहे. हे कोणत्या प्रकारचं हिंदुत्वाचं मॉडल आहे. कोणत्या प्रकारे हिंदुत्व आहे. हे हिंदु राष्ट्र नको आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविषयी काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले, फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ते वारंवार बोलत असतात. अधूनमधून हिंदीत बोलत असले तरी महाराष्ट्रात मराठी सक्ती आहे हे विधान ते जोरात करतात. मग मराठी माणसाला त्रास का होतोय. त्याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे. मराठी आत्मा आणि स्वाभिमान जीवंत असेल तर.

Follow Us
पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...बड्या नेत्याचा दावा
मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटन...
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री...
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या...
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसणाचे दर तब्बल 200 रुपये किलोपर्यंत
सरसकट 80 ते 100 रुपयांची वाढ, कांद्यानंतर आता स्वयंपाकघरात दररोज उपयोगात येणारी वस्तुही महागली
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप,
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप, तब्बल 15 लाख...
विक्रेत्यांना 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करता येणार नाही
साखरेच्या साठेबाजीवर चाप लावण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
'मुंबई रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा अनिवार्य करा'
मुंबई रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा अनिवार्य करा: पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
मुंबईतील रिक्षा, टॅक्सी चालकांची मराठी सक्ती विरोधात जनहित याचिका
मराठी सक्तीविरोधात रिक्षा, टॅक्सी चालकांची उच्च न्यायालयात धाव
पालिकेतील चुकीच्या निर्णयांवर अमित साटम यांचा इशारा
अमित साटम यांची मुंबई महापौर रितू तावडे आणि पालिका अधिकाऱ्यांना सक्त ताकीद