AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळासाहेबांनी पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला, महाराष्ट्र जात-धर्म मानत नाही, राऊतांचे फडणवीसांना उत्तर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच मनोहर जोशी यांच्या रुपाने महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला, याची आठवण संजय राऊत यांनी करुन दिली

बाळासाहेबांनी पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला, महाराष्ट्र जात-धर्म मानत नाही, राऊतांचे फडणवीसांना उत्तर
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Sep 18, 2020 | 11:14 AM
Share

नवी दिल्ली : “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच मनोहर जोशी यांच्या रुपाने महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला, महाराष्ट्र जात-पात-धर्म मानत नाही” अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिले. ब्राह्मण असल्याने आपल्याला मराठा आरक्षणाच्या लढाईदरम्यान टार्गेट केल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता. (Sanjay Raut answers Devendra Fadnavis allegation over target for being Brahmin CM)

“महाराष्ट्र जात-पात-धर्म मानत नाही. महाराष्ट्राने मुस्लिम मुख्यमंत्री पाहिला आहे. अल्पसंख्याक मंत्री राज्यात होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच मनोहर जोशी यांच्या रुपाने महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला” याची आठवण संजय राऊत यांनी करुन दिली. संजय राऊतांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी शेतकरी विधेयक आणि इतर विषयांवर दोघांची चर्चा झाल्याची माहिती आहे.

“अकाली दल एनडीएतच आहे, ते बाहेर पडले असे आपण म्हणू शकत नाही. त्यांनी फक्त शेतकरी विधेयकावरुन मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. संवाद थांबल्याचा हा परिणाम आहे. संवाद राहिला असता तर शिवसेनेलाही मजबुरीने बाहेर पडावं लागलं नसतं, पण तो इतिहास झाला” असं राऊत म्हणाले.

“शिवसेना आणि अकाली दल हे एनडीएचे मजबूत खांब होते. मात्र आता दुसरा खांबही डळमळीत झाला आहे. त्यामुळे एनडीए अस्तित्वात आहे हे मानायला तयार नाही” असेही ते म्हणाले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस साजरा केला नाही. विरोधीपक्षांनी तो बेरोजगार दिवस म्हणून साजरा केला. पण देशाच्या प्रमुखांच्या बाबतीत असा नकारात्मक दिवस साजरा करणं हे बरं नाही. बेरोजगारांचा प्रश्न निश्चितच मोठा आहे, भविष्यातील ती सर्वात मोठी समस्या आहे, पण तो प्रश्न एका दिवसात सुटणारा नाही.” असं संजय राऊत म्हणाले.

संबंधित बातम्या :

‘ब्राह्मण असल्याने टार्गेट’, मराठा आरक्षण लढाईदरम्यान फडणवीसांचा आरोप

(Sanjay Raut answers Devendra Fadnavis allegation over target for being Brahmin CM)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...