AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारची जीभ दिल्लीत गहाण ठेवलीय का? संजय राऊत यांचा सवाल, म्हणाले उद्धव ठाकरे हेच सरकार!

महाराष्ट्राच्या राजकारणावर तीव्र टीका करताना संजय राऊत म्हणाले, ' महाराष्ट्रात जे चाललंय, त्याबद्दल संतप्त वातावरण आहे. सरकार आहे कुठे?

सरकारची जीभ दिल्लीत गहाण ठेवलीय का? संजय राऊत यांचा सवाल, म्हणाले उद्धव ठाकरे हेच सरकार!
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 26, 2022 | 10:48 AM
Share

मुंबईः राज्यपालांच्या बाबतीत सरकार गप्प बसलंय, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी (Karnataka CM) सोलापूर-सांगली खेचून नेण्याची भाषा केली तरी सरकार तोंड शिवून बसलंय आणि भाजपाचे (BJP) महाप्रचारक महिलांविषयी बोलतात तरी सरकार गप्प बसलंय. त्यामुळे या सरकारची जीभ दिल्लीत गहाण ठेवलीय का, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला.  प्रसार माध्यमांना विविध विषयांवर प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी हे वक्तव्य केलं. बुलढाणा इथं आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा आहे. येथे आयोजित केलेल्या भव्य शेतकरी मेळाव्याला ते संबोधित करतील, याचीही माहिती संजय राऊत यांनी पत्रकारांना दिली.

संजय राऊत म्हणाले, ठाकरे हेच खरं सरकार आहे. आम्ही सगळे आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांशी संवाद साधायला जात आहोत. बुलढाण्यात जाहीर सभा आहे. उद्धव ठाकरे अनेक विषयांवर भूमिका व्यक्त करतील. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी घेतलेली आक्रमक भूमिका, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेलं अपमानास्पद वक्तव्य असेल… या सगळ्यांचा समाचार आज घेतला जाईल.

या मोहीमेत अनेक विरोधी पक्षांचा पाठींबा आम्हाला मिळतोय. भारतीय जयहिंद पार्टीनेही कालच आम्हाला पाठींबा जाहीर केल्याचं संजय राऊत म्हणाले.

महिलांबाबत लज्जास्पद विधान केल्यावर अमृता वहिनी गप्प कशा बसल्या. बोलणाऱ्याच्या सणसणीत कानाखाली बसायला पाहिजे एका बाजूला महिलांबाबत सक्षमीकरणाचे कायदे करायचे आणि दुसरीकडे यावर मूग गिळून का गप्प बसले, असा सवाल संजय राऊत यांनी केला. ठाण्यात झालेल्या एका कार्यक्रमाच्या संदर्भाने संजय राऊत यांनी ही टीका केली.

महाराष्ट्राच्या राजकारणावर तीव्र टीका करताना संजय राऊत म्हणाले, ‘ महाराष्ट्रात जे चाललंय, त्याबद्दल संतप्त वातावरण आहे. सरकार आहे कुठे? आज बुलढाण्यात आम्ही जनतेसमोर बोलणार आहेत. छत्रपती शिवरायांसारखा वीरपुरुष ज्या मातेनं दिला, त्या राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या भूमीत आजची सभा आहे. त्या भूमीत फक्त निष्ठा आणि इमान याचंच बीज आहे.. तिथे बेईमानांना थारा नाही. अशा विदर्भ आणि मराठवाड्यात उद्धव ठाकरे यांनी विराट सभा आयोजित करण्यात आल्याचं राऊत यांनी सांगितलं.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.