AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी, शहा आणि फडणवीस यांची भेट घेणार; संजय राऊत यांनी भेटीचं कारणही सांगितलं

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचा नसतो. मी फडणवीसांना भेटणार. मोदी आणि शहांनाही भेटणार. माझ्याबाबत काय झालं त्याची माहिती मी मोदी आणि शहा यांना देणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मोदी, शहा आणि फडणवीस यांची भेट घेणार; संजय राऊत यांनी भेटीचं कारणही सांगितलं
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 10, 2022 | 11:25 AM
Share

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी तुरुंगातून सुटल्यानंतर आज पहिल्यांदाच मीडियाशी सविस्तर संवाद साधला. तुरुंगातील यातना कुणाच्याही वाट्याला येऊ नये. तुरुंगात राहणं फारच कठिण असतं, असं सांगतानाच लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी सांगितलं. माझ्यावर काय अन्याय झाला याची तक्रारच मोदी आणि शहांकडे करणार असल्याचंही राऊत यांनी सांगितलं.

संजय राऊत तब्बल तीन महिन्यानंतर संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक करतानाच त्यांना भेटणार असल्याचं जाहीर केलं. मी सर्वांना भेटणार आहे. मी फडणवीस यांनाही दोन-तीन दिवसात भेटणार आहे. लोकांची काही कामे आहेत. माझा भाऊ आमदार आहे. त्यांच्या मतदारसंघातीलही कामे आहेत. त्यामुळे मी फडणवीस यांची भेट घेणार आहे, असं संजय राऊत म्हणाले.

राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच चालवत आहेत. हे माझं निरीक्षण आहे. राज्याचं नेतृत्व फडणवीसच करत आहेत. ते अनुभवी नेते आहेत. महत्त्वाचे निर्णय त्यांच्याकडूनच ऐकत आहेत. त्यांच्या खात्याशी निगडीत काम आहे. त्यामुळे मी त्यांना भेटणार आहे, असं ते म्हणाले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचा नसतो. मी फडणवीसांना भेटणार. मोदी आणि शहांनाही भेटणार. माझ्याबाबत काय झालं त्याची माहिती मी मोदी आणि शहा यांना देणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मी खासदार आहे. मी सरकारी कामासाठी कुणाला भेटू शकतो. माझा भाऊ आमदार आहे. कोणत्या कामासाठी भेटू शकत नाही का? हा महाराष्ट्र आहे. इथे राजकारणी एकमेकांना भेटत असतात. मी तुरुंगात होतो. तेव्हा फडणवीस म्हणाले होते कटुता थांबली पाहिजे. त्यामुळे फडणवीस यांना भेटलं तर गैर काय? असं सांगतानाच भाजपच्या विरोधात लढाई सुरूच राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस राहणार बंद
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस बंद
मोठी बातमी! एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य
एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य: गांजा सेवनानंतर कठोर निर्णय
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ: परिवहन विभागाचा निर्णय
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या: राजकीय घडामोडी, हवामान अंदाज आणि महत्त्वाचे निर्णय
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?