AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री केवळ भाजप दिलेला शब्द पाळतात, मराठा समाजाला दिलेला शब्द पाळत नाहीत; संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut on CM Eknath Shinde and Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांना घेऊन दिल्लीला जा अन् पंतप्रधान मोदी यांना भेटा!; संजय राऊत यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारला सल्ला दिला आहे. तसंच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. वाचा...

मुख्यमंत्री केवळ भाजप दिलेला शब्द पाळतात, मराठा समाजाला दिलेला शब्द पाळत नाहीत; संजय राऊतांचा हल्लाबोल
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Oct 23, 2023 | 12:30 PM
Share

गणेश थोरात, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, मुंबई | 23 ऑक्टोबर 2023 : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजप आणि बिल्डरला दिलेला शब्द पाळतात. समाजाला दिलेला शब्द पाळत नाहीत. एकदा जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाऊन भेटा. कायद्यात दुरुस्ती करा. त्यांना तसं सांगा. ते तुमचे लाडके आहात ना? मग त्यांना आरक्षण द्यायला सांगा. मनोज जरांगे पाटील यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे घेऊन जा आणि कायद्यात दुरुस्ती केलेलं प्रमाणपत्र घेऊन यावं, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

जे तरूण आत्महत्या करत आहेत. ती मराठी मुलं आहेत. आज तिसरी आत्महत्या झाली. त्यांचं असं आत्महत्या करणं पाहावत नाही. सरकारला आरक्षण द्यायचे की नाही हे स्वतः मराठा समजणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे अजितदादा पवार यांनी समोर येऊन सांगायला हवं. उद्या मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली मुदत संपत आहे. तीन आत्महत्या झाल्या. पण सरकारच्या डोळ्यांची पापणी देखील हलत नाही. हे निर्दयीपणाचं लक्षण आहे, असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

मराठा मतांसाठी भाजपने मराठ्यांचा चेहरा म्हणून तुम्हाला बसवलं आहे ना? सरकार जाहिराती करत आहे आम्ही टिकाऊ आरक्षण देऊ यासाठी तुम्हाला बसवलं नाही. तुमच्या सरकारमधील काही लोक हे वेगळ्या दिशेने चालले आहेत. त्यामुळे दिवाळीच्या आधी या राज्यामध्ये वातावरण बिघडू शकतं, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे.

छगन भुजबळ हुलकावण्या देत आहेत. लोकांना भडकावत आहेत. शिंदे गटातील काही स्वतःला मराठा समजणारे काही 96 कुळी नेते आहेत. ते लोकांना भडकवत आहेत. आम्ही कुणबी नाही, आम्हाला कोणी सर्टिफिकेट नको, म्हणत आहेत. दिल्लीत केंद्रातील नेत्यांची भाषा वेगळी आहे. या आंदोलनामध्ये फूट पाडण्याची सधन मराठ्यांनी रणनीती आखली आहे का? हा लढा गरीब मराठ्यांचा आहे. दुर्बल मराठा समाजासाठीचा लढा मनोज जरांगे पाटील यांचा आहे. त्यामुळे याकडे सरकारने गांभीर्याने पाहावं, असं आवाहनही संजय राऊत यांनी शिंदे सरकारला केलं आहे.

जर चौथी आत्महत्या झाली. तर मराठा समाजाच्या नेत्यांनी आणि संघटनांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारवर सदोष मनुष्यवादाचा एफआयआर दाखल करावा, असंही राऊत म्हणाले.

Follow Us
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...
सर्वात मोठी अपडेट! धर्मेद्र प्रधानांनी राजीनामा देताच प्रल्हाद जोशी...
सर्वात मोठी अपडेट! धर्मेद्र प्रधानांनी राजीनामा देताच प्रल्हाद जोशी शिक्षण मंत्री
एकीकडे ठाकरे बंधूंची सभा, तर दुसरीकडे संजय शिरसाट थेट अभिजीत दीपकेच्या
एकीकडे ठाकरे बंधूंची सभा, तर दुसरीकडे संजय शिरसाट थेट अभिजीत दीपकेच्या घरी, राज्याच्या राजकारणात मोठं घडतंय?
महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिसांमधला फरक जगाला कळला; राज ठाकरेंचा टोला
महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिसांमधला फरक जगाला कळला; राज ठाकरेंचा टोला
पेपरफुटीचे फायदे सांगणाऱ्या.... निर्मला सीतारमण यांच्याबाबत ठाकरे
पेपरफुटीचे फायदे सांगणाऱ्या.... निर्मला सीतारमण यांच्याबाबत उद्धव ठाकरे हे काय म्हणाले?
ही जनतेच्या आंदोलनाची ताकद, अखेर सरकारला नमवलं; राज ठाकरेंचं भाषण...
ही जनतेच्या आंदोलनाची ताकद, अखेर सरकारला नमवलं; राज ठाकरेंच्या भाषणाची जोरदार चर्चा