AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सौ सोनार की एक लोहार की; पत्रकार परिषदेपूर्वीच संजय राऊतांचा सूचक इशारा

शिवसेनेची (shivsena) आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. त्यापूर्वीच शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी सूचक इशारा दिला आहे. आज पत्रकार परिषद होणार आहे. मी स्वत:च जाहीर केलं आहे.

सौ सोनार की एक लोहार की; पत्रकार परिषदेपूर्वीच संजय राऊतांचा सूचक इशारा
संजय राऊत
| Updated on: Feb 15, 2022 | 10:41 AM
Share

मुंबई: शिवसेनेची (shivsena) आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. त्यापूर्वीच शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी सूचक इशारा दिला आहे. आज पत्रकार परिषद होणार आहे. मी स्वत:च जाहीर केलं आहे. त्यामुळे तुम्ही थोडी वाट पाहा. आमचीही पत्रकार परिषद पाहा. या, ऐका. कधी तरी शिवसेनेचं ऐका. सौ सोनार की एक लोहार की आज करणार आहोत, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. मात्र, दुपारी पत्रकार परिषदेत काय गौप्यस्फोट करणार यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. तसेच भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit somaiya)यांच्या आरोपावर विचारलं असता अरे सोड रे ते… असं म्हणत त्यांनी सोमय्यांच्या प्रश्नावर बोलण्यास टाळलं. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून राऊत हे अत्यंत गर्भित इशारे देत आहेत. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत ते काय पोलखोल करणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संबंधित ठिकाणांवर आज छापेमारी सुरू आहे. त्याबाबत त्यांना विचारण्यात आलं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. या रेड संदर्भात माझ्याकडे माहिती नाही. राष्ट्राच्या सुरक्षेसंदर्भात काही विषय असतील, काही गंभीर गोष्टी असतील आणि केंद्राकडे माहिती असेल तर केंद्रीय तपास यंत्रणांना सहकार्य केलं पाहिजे. दाऊदवर काही बोलू नये. काही कारवाई सुरू असेल तर राज्य आणि केंद्राने एकत्रित कामे केलं पाहिजे, असं राऊत म्हणाले.

नावं समोर येतील की घुसवली जातील

दाऊदच्या ठिकाणावर रेड सुरू असून त्यात काही राजकीय नेत्यांची नावं येत आहेत. त्याबाबतही त्यांना विचारण्यात आलं. त्यावर नावं समोर येतील की नावं घुसली जातील हा एक प्रश्नचिन्ह आहे. छत्तीसगड ते पश्चिम बंगालपर्यंत तेच सुरू आहे. मी त्यावर बोलणार नाही. राष्ट्रीय एकात्मता राष्ट्रीय सुरक्षा हा गंभीर आणि नाजूक विषय असतो, असंही त्यांनी सांगितलं.

गुजरातमधील घोटाळा कुणी दाबला?

कोणत्याही राजकीय पक्षासाठी यंत्रणा नाही. गुजरातमध्ये 25 हजार कोटीचा घोटाळा झाला आहे. हा देशातील सर्वात मोठा बँक फ्रॉड आहे. आता ईडी तिथे काय करते ते पाहायचं आहे. तिथे ईडी का जात नाही? दोन वर्षापासून हा घोटाळा दाबण्याचा प्रयत्न झाला. कोण होते हे लोक? घोटाळा दाबण्यासाठी कुणीकुणी प्रयत्न केले? आरोपी कसे पळाले? हा संशोधनाचा विषय आहे, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

संजय राऊतांचं ट्विट व्हायरल, आज होणार पत्रकार परिषद; ते साडेतीन लोक कोण ?

धक्कादायक! साईबाबांच्या शिर्डीवर दहशतवाद्यांचा डोळा, दुबईतून अटक केलेल्या अतिरेक्यांकडून खळबळजनक कबुली

श्रद्धेचा बाजार मांडला; नाशिकमध्ये पुरोहितांमध्ये वाद, पूजेसाठी आलेले यजमान पळवले…!

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.