AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हातातील खंजीर बाजूला ठेवा, मगच शिवसेनाप्रमुखांच्या स्मृती स्थळावर जा; संजय राऊत यांचा हल्लाबोल

जे खूनी आणि हत्यारे आहेत. त्यांच्यावर खटलेही चालू नयेत. यांच्यावर राजकारण कोणी करत असेल तर बंद केले पाहिजे. खटले न चालवता परिस्थितीजन्य पुराव्यावरून खुन्यांना फासावर लटकवले पाहिजे.

हातातील खंजीर बाजूला ठेवा, मगच शिवसेनाप्रमुखांच्या स्मृती स्थळावर जा; संजय राऊत यांचा हल्लाबोल
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 16, 2022 | 11:04 AM
Share

मुंबई: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या स्मृती दिन आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शिवाजी पार्कात जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन करणार आहेत. उद्या स्मृती स्थळावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीय असतील. शिवाय शिवसैनिकही मोठ्या प्रमाणावर असणार आहे. त्यामुळे यावेळी वाद होण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्र्यांनी आजच स्मृती स्थलावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. बाळासाहेबांचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर हातातील खंजीर बाजूला ठेवून जा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

ज्यांना बाळासाहेबांना अभिवादन करायचं त्यांना करू द्या. बाळासाहेब ठाकरे देशाचे आणि विश्वाचे आहेत. फक्त आपल्या हातातील खंजीर बाजूला ठेवा आणि मग स्मारकाला हात जोडायला जा. तरच बाळासाहेबांचे आशीर्वाद घ्या, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

आपल्या हातातील खंजीर बाजूला ठेवा. कोणीही असतील. त्यांनी हातातील खंजीर बाजूला ठेवूनच बाळासाहेबांना अभिवादन करावं. मी व्यक्तिगत नाव घेत नाही. बाळासाहेब ही एक अशी आत्मा आहे ते सर्व पाहात आहेत. बाळासाहेबांच्या पाठीत जे खंजीर खुपसतात त्यांचं कधी भलं झालं नाही. हा इतिहास आहे. सर्वजण स्मृतीस्थळावर जाऊ शकतात पण चांगल्या मानाने जा, असा टोला त्यांनी लगावला.

यावेळी त्यांनी दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडावर संताप व्यक्त केला. ते कपल नाहीये. महाराष्ट्रातील मुलीची हत्या धक्कादायक आणि दुर्देवी आहे. सोशल मीडियातून ओळखी होतात. पुढे त्याचं रुपांतर भयंकर नात्यात होतं. मी तिच्या वडिलांची मुलाखत वाचत होतो. त्या कुटुंबाचा आक्रोश, वेदना समजून घेतली पाहिजे. कोणत्या धुंदीत आणि गुंगीत ही मुलं जगत आहेत. हे आज परत एकदा कळलं, असं ते म्हणाले.

जे खूनी आणि हत्यारे आहेत. त्यांच्यावर खटलेही चालू नयेत. यांच्यावर राजकारण कोणी करत असेल तर बंद केले पाहिजे. खटले न चालवता परिस्थितीजन्य पुराव्यावरून खुन्यांना फासावर लटकवले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

देशभरातील मुलींनीही सावधपणे जगण्यास शिकलं पाहिजे. अशा प्रकारे फसवलं जात असेल तर ही विकृती आहे. हे विकृतीच्याही पुढचं पाऊल आहे. रोज एक एक माहिती येते ती थरारक आहे. या प्रकरणात कोणत्याही प्रकारचं राजकारण करू नये, असं आवाहन त्यांनी केलं.

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.