AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री म्हणाले 50-50 ठरलंच नाही, संजय राऊत यांनी ‘तो’ व्हिडीओच लावला

'सत्ता, पद आणि जबाबदाऱ्यांचे समान वाटप होईल, असं मुख्यमंत्री स्वतः सांगत आहेत. याचा अर्थ समजून घ्यायचा, डिक्शनरीमधील व्याख्या अजून बदललेल्या नाहीत.' असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं.

मुख्यमंत्री म्हणाले 50-50 ठरलंच नाही, संजय राऊत यांनी 'तो' व्हिडीओच लावला
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Oct 29, 2019 | 2:22 PM
Share

मुंबई : अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरलाच नव्हता, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना त्यांचाच व्हिडीओ दाखवत फॉर्म्युलाची आठवण करुन (Sanjay Raut to Devendra Fadanvis) दिली आहे. ‘सत्ता, पद आणि जबाबदाऱ्यांचे समान वाटप होईल, असं मुख्यमंत्री स्वतः सांगत आहेत’ असं म्हणत संजय राऊत यांनी 50-50 च्या फॉर्म्युलाकडे भाजपचं लक्ष वेधलं.

अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरलाच नव्हता, या देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यावरुन ‘टीव्ही9 मराठी’ने संजय राऊत यांना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देण्याआधीच राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक जुना व्हिडीओ लावून दाखवला. लोकसभा निवडणुकांपूर्वी म्हणजेच 18 फेब्रुवारी 2019 रोजी युतीची घोषणा करतानाचा हा देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ आहे.

‘सत्ता, पद आणि जबाबदाऱ्यांचे समान वाटप होईल, असं मुख्यमंत्री स्वतः सांगत आहेत. याचा अर्थ समजून घ्यायचा, डिक्शनरीमधील व्याख्या अजून बदललेल्या नाहीत.’ असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं.

अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरलाच नव्हता, असा दावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला चांगलंच अडचणीत आणलं आहे. ‘वाटायला काय, त्यांना पाचही वर्ष मुख्यमंत्रिपद पाहिजे, असं वाटू शकतं’, असा टोमणाही फडणवीसांनी लगावला. दिवाळीनिमित्त पत्रकारांसोबत रंगलेल्या अनौपचारिक गप्पांदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी अनेक गौप्यस्फोट केले.

‘राजकारणात मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा आहे की नाही हे आम्ही ठरवू. आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधात लिहिलं म्हणून 2014 मध्ये सरकार आलं, हे विसरु नका’ अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला सुनावलं. मी ‘सामना’मधून पक्षाच्याच भूमिका मांडतो. ज्या निवडणुकांपूर्वी भूमिका ठरल्या होत्या, त्या द्या, असंही राऊत म्हणाले. ‘सामना’वर आमची नाराजी आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्याविरोधात तर असं लिहून पहा, असं मुख्यमंत्री म्हणाले होते.

‘त्यांच्याकडे 146 आमदारांचं संख्याबळ असेल, तर त्यांना कोण रोखणार? मी किंवा प्रकाश आंबेडकर किंवा चंद्रकांत पाटील, शरद पवार कोणीही म्हणालं, आमच्याकडे 146 आमदारांचं संख्याबळ आहे, तर त्यांना कोण रोखणार? उद्या एकनाथ खडसे आले जळगावातून आणि म्हणाले माझ्याकडे 145 संख्याबळ आहे, तर ते मुख्यमंत्री होतील’ असं संजय राऊत (Sanjay Raut to Devendra Fadanvis) म्हणाले.

‘भाजपचे राष्ट्रीय नेत्यांनी येऊन समजूत काढण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही काय हट्टाला पेटलेले आणि चुकीच्या मागण्या करत बसलेले नाही आहोत. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे, माझ्यावर फणा काढून बोलण्याची गरज नाही’ असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या :

शिवसेना की भाजप, कोण खोटं बोलतंय? लोकसभेपूर्वी कोणता फॉर्म्युला ठरला?

मीच मुख्यमंत्री, आदित्यला काय ते शिवसेना ठरवेल, मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची 10 विधाने

अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरलाच नव्हता : मुख्यमंत्री

पावसात भिजावं लागतं, हा अनुभव कमी पडला, फडणवीसांचे पवारांना चिमटे

मी 5 वर्ष मुख्यमंत्री राहील याबाबत काहीही शंका नाही : देवेंद्र फडणवीस

Follow Us
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार.
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह...
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात...
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर..
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर...
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये..
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये...
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!.
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,.
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;.
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले....
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले.....