AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : मंत्रिमंडळ विस्तारावरून जुंपली, घटनेचा दाखल देत राऊतांचं ट्विट, हे काय चाललंय?, राज्यपलांनाही सवाल

सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अजून का होईना? असा सवाल विरोधकांकडून रोज विचारण्यात येतोय, तर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घटनेचा दाखला देत थेट राज्यपालांना सवाल केलाय.

Sanjay Raut : मंत्रिमंडळ विस्तारावरून जुंपली, घटनेचा दाखल देत राऊतांचं ट्विट, हे काय चाललंय?, राज्यपलांनाही सवाल
मंत्रिमंडळ विस्तारावरून जुंपली, घटनेचा दाखल देत राऊतांचं ट्विट, हे काय चाललंय?, राज्यपलांनाही सवाल
| Edited By: | Updated on: Jul 16, 2022 | 6:59 PM
Share

मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांचं मोठं बंड झालं, ठाकरे सरकार कोसळलं आणि गेल्या पंधरा दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दोघांच्या रूपानं राज्याला नवं सरकार मिळालं. मग दोन दिवसांचं अधिवेशन घेत तातडीने विधानसभा अध्यक्षांची निवडही केली, विधानसभा अध्यक्षपदीर राहुल नार्वेकर विराजमान झाले. तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी सरकारने आपला बहुमतही सिद्ध केलं. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही झाला नाही. 160 पेक्षा जास्त आमदारांचं समर्थन असणाऱ्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अजून का होईना? असा सवाल विरोधकांकडून रोज विचारण्यात येतोय, तर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घटनेचा दाखला देत थेट राज्यपालांना सवाल केलाय.

थेट राज्यपलांना सवाल

हे सरकार बेकायदेशीररित्या आल्याचा आरोप तर संजय राऊत वारंवार करत आहेत. मात्र आता संजय राऊत यांनी एक ट्विट केले, त्यामध्ये ते लिहितात, “भारतीय राज्यघटनेच्या कलम 164 1A नुसार राज्याचे मंत्रीमंडळ किमान 12 मंत्र्यांचे असणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येचा मंत्रिमंडळाला घटनेची मान्यता नाही. गेले 2 आठवडे महाराष्ट्रात 2 मंत्र्यांचे मंत्रीमंडळ जे निर्णय घेतेय त्याला घटनात्मक वैधता नाही राज्यपाल, हे काय सुरू आहे ?” असे ट्विट राऊतांकडून करण्यात आलंय. त्यामुळे आता मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिंदे आणि फडणवीसांवरती दबाही वाढताना दिसत आहे.

संजय राऊतांचं ट्विट

हरी नरके यांनीही हाच दाखला दिला

प्राध्यापक हरी नरके यांनी याच कलमाचा दाखला देत नियमावर ती बोट ठेवलं आहे आणि दोन मंत्र्याच्या कॅबिनेटवर सवाल उपस्थित केले आहेत. त्यामुळे आता पुन्हा विरोधात आणि सत्ताधारी आमने सामने आले आहेत. तसेच हे प्रकरण कोर्टात गेल्यास फडणवीस आणि शिंदेंना अडचणीत आणणार का? असाही सवाल उपस्थित होत आहे. तर कॅबिनेटचा विस्तार हा लवकरच होईल, माझं आणि मुख्यमंत्र्यांचं बोलणं झालं आहे. अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे आता तरी तातडीने विस्तार होणार का? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हजारो आदिवासी व शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मंत्रालयाच्या दिशेने
हजारो आदिवासी व शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मंत्रालयाच्या दिशेने.
महाराष्ट्र हिरवा करण्याची कुणाची हिंमत नाही; मोहोळ स्पष्टच बोलले
महाराष्ट्र हिरवा करण्याची कुणाची हिंमत नाही; मोहोळ स्पष्टच बोलले.
मलाड रेल्वे स्थानकातील हत्या प्रकरणाचा नवा CCTV समोर
मलाड रेल्वे स्थानकातील हत्या प्रकरणाचा नवा CCTV समोर.
मालाड रेल्वेस्थानक हत्या प्रकरण; आरोपीला अटक, काय होणार शिक्षा?
मालाड रेल्वेस्थानक हत्या प्रकरण; आरोपीला अटक, काय होणार शिक्षा?.
डोंबिवलीत मराठी मुलीच्या एकाच स्टॉलवर कारवाई, नेमकं काय घडलं?
डोंबिवलीत मराठी मुलीच्या एकाच स्टॉलवर कारवाई, नेमकं काय घडलं?.
मालाडमध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर
मालाडमध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर.
संजय राऊतांचा न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यावर खटल्यात दिरंगाईचा आरोप
संजय राऊतांचा न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यावर खटल्यात दिरंगाईचा आरोप.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; काय असणार रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; काय असणार रेल्वेचं वेळापत्रक.
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी.
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका.