AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘स्वातंत्र्या, तुझी व्याख्या काय?’, सामनाच्या रोखठोक सदरातून संजय राऊतांचा भाजपवर प्रहार

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरातून केंद्रीय तपास यंत्रणांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सोबतच भाजपवरही पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला आहे.

'स्वातंत्र्या, तुझी व्याख्या काय?', सामनाच्या रोखठोक सदरातून संजय राऊतांचा भाजपवर प्रहार
| Updated on: Dec 06, 2020 | 8:54 AM
Share

मुंबई: कंगना रनौत, अर्वण गोस्वामी, सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सामनाच्या रोखठोक या सदरातून भाजपवर हल्ला चढवला आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात व्यक्तिगत स्वातंत्याची गळचेपी होत असल्याची बोंब मारली जात आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याच्या कणाकणात स्वातंत्र्य आहे. पण विषय असा आहे की, स्वातंत्र्याची व्याख्या आज सोयीनुसार बदलली जात आहे. इंदिरा गांधी यांनी व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी केली असा सिद्धांत जे मांडतात ते तरी आज वेगळे काय करीत आहेत? स्वातंत्र्याची व्याख्या काय असा सवाल रोखठोकमधून संजय राऊत यांनी विचारला आहे. (Sanjay Raut’s criticism of the Central Investigation Agency)

इंदिरा गांधींच्या काळात आणीबाणी लादली गेली व पावलोपावली कायद्याचं उल्लंघन झालं. इंदिराजींच्या काँग्रेस राजद्यात कोणाला राज्यघटनेची पर्वा नव्हती आणि न्यायालयाची प्रतिष्ठाही वाटत नव्हती. हा भाजप पुढाऱ्यांचा मोठा आवडता सिद्धांत आहे. या सिद्धांताचा उपसिद्धांत असा की, भाजपचे पुढारी केंद्रीय तपास यंत्रणा व नय्यालयाच्या प्रतिष्ठेला जिवापाड जपत आहेत, पण या उपसिद्धांतात कसा फोलपणा आहे हे अलीकडच्या घटना, घडामोडींवरुन दिसत आहे. खरे म्हणजे सत्ता महत्वाची. त्यापुढे भाजपला कशाचीच पर्वा नाही, अशी प्रतिमा निर्माण झाली आहे ती धोक्याची घंटाच आहे. राजस्थानात काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी पुन्हा घोडेबाजार सुरु झाला आहे व महाराष्ट्रातही त्यासाठी विविध स्तरांवर राजकीय खानावळी व स्टॉल्स उभे केले आहेत. या स्टॉलवर कोणी फिरकला नाही म्हणून ईडीसारख्या संस्थांना पकडून स्टॉलवर जबरदस्तीने लोक आणण्याचा प्रयोग सुरु झाला. भाजपची केंद्रीय सत्ता असे बिंबवण्याचा प्रयत्न करित आहेत की, आम्ही सर्व सत्ताधीश आहोत. सर्वोच्च न्यायालयापासून ते सर्व स्तरांवरील तपाय यंत्रणांवर फक्त आमचीच हुकुमत चालते. आम्ही तुम्हाला रगडू शकतो. तेव्हा आमच्या स्टॉलवर रांग लावून उभे राहा. हे सर्व कसे आणि का सुरु आहे? असा प्रश्न रोखठोकमधून संजय राऊत यांनी विचारलाय.

‘केंद्रीय तपास यंत्रणां कळसूत्री बाहुल्या!’

यावेळी संजय राऊत यांनी कंगना रानौत, रिपब्लिकचे संपादक अर्णव गोस्वामी आणि सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा उल्लेख करत भाजपवर जोरदार टीका केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणा या कळसूत्री बाहुल्या झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केलाय. ‘सीबीआयने स्वत:चे धिंडवडे स्वत:च काढले आहेत. ईडीसारख्या संस्था या राजकीय मालकांच्या कळसूत्री बाहुल्या बनल्या आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर लोक संशय घेत आहेत. या संस्था म्हणजे राष्ट्राचा स्तंभ नसून सत्ताधाऱ्यांच्या चाकर बनत असतील तर अराजकाचा स्फोट होईल. सुडाचे हत्यार म्हणून या संस्थांचा वापर सुरु आहे. सूडबुद्धीने वागणारे सत्ता उबवू शकतात, पण राष्ट्र चालवू शकत नाहीत.’

मनमानी आणि स्वैराचार

व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे मनमानी किंवा स्वैराचार नव्हे. एखादा गुन्हा तुमच्याविरुद्ध नोंदवल्यावर तपास आणि कारवाईसाठी पोलिसांनी आपल्यापर्यंत पोहोचू नये, पोलिसांनी आपल्या केसाला जरी धक्का लावला तर ते व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचे हनन ठरेल असं जर कुणाला वाटत असेल तर ते मूर्ख आहेत. विधानसभेने आणलेल्या हक्कभंगाबाबतही सर्वोच्च न्यायालय निर्णय देते आणि विधानसभेला कारवाईपासून रोखते. शासन यंत्रणा आणि विधिमंडळातील समतोल बिघडवण्याचा हा प्रयत्न असल्याचं राऊत यांचं मत आहे.

जे सरकारविरोधात बोलतील आणि सरकारला प्रश्न विचारतील त्यांना कायद्याचे समान संरक्षण लाभणार नाही हे आता पक्के झाले आहे. मानवी स्वातंत्र्य महत्वाचेच आहे, पण त्या व्याख्येत देशाची 120 कोटी जनता बसत नाही. मूठभर लोकांसाठीच हे स्वातंत्र्य आहे. अलीकडच्या घटना तेच सांगत आहेत. स्वातंत्र्याला मालक निर्माण झाले आहेत. न्यायालयाने न्यायाची व्याख्याच बदलून टाकली आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी ‘रोखठोक’मधून केला आहे.

संबंधित बातम्या:

Sanjay Raut Exclusive | चिंतन आणि आत्मचिंतनाची बैठक त्यांच्याकडे जास्त, आम्ही कृती आणि अ‍ॅक्शनवाले : संजय राऊत

Sanjay Raut | संजय राऊतांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज, डॉक्टरांकडून आराम करण्याचा सल्ला

‘भाजप कार्यकर्ता नटी म्हणते मुंबई म्हणजे PoK, योगींनी सांगावं ते नेमके कुठे आलेत’, संजय राऊतांचा टोला

Sanjay Raut’s criticism of the Central Investigation Agency

Follow Us
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.