AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार धूर्त राजकारणी, 2024 आधीच हिशोब चुकता करतील; शालिनीताई पाटील यांचं मोठं विधान

सिंचन घोटाळ्याचे अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप आहेत. या सगळ्यांचे पुरावे माझ्याकडे आहेत. भविष्यामध्ये ते सगळे पुरावे मी समोर आणणार आहे, असा इशारा शालिनीताई पाटील यांनी दिला.

शरद पवार धूर्त राजकारणी, 2024 आधीच हिशोब चुकता करतील; शालिनीताई पाटील यांचं मोठं विधान
shalini patilImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 08, 2023 | 1:38 PM
Share

मुंबई : वसंतदादा पाटील यांच्या काळात शरद पवार यांनी केलेल्या बंडामागे एक विचार होता. अजित पवार यांनी केलेल्या बंडामागे कोणताही विचार नाही. केवळ त्यांना सत्ता आणि संरक्षण हवं आहे. केलेल्या अपराधांना झाकण्यासाठी त्यांना संरक्षण पाहिजे. त्यासाठी सत्तेत जायचं आहे. पण असल्या बेसवर ते फार काळ टिकणार नाहीत. शरद पवार मुत्सद्दी राजकारणी आहेत. धूर्त आहेत. ते कुणाला माफ करत नाहीत. 2024 पर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. त्या आधीच ते हिशोब चुकता करतील, असं मोठं विधान माजी आमदार आणि ज्येष्ठ राजकारणी शालिनीताई पाटील यांनी केलं आहे. शालिनीताई पाटील यांनी अनेक महत्त्वाचे दावेही केले आहेत. त्या मीडियाशी संवाद साधत होत्या.

ज्येष्ठ म्हणून माझा अजित पवार यांना सल्ला राहील. अर्थात तो मानावा अथवा मानू नये. त्यांनी केलेली ही चूक आहे, असं मला वाटतं. ते भाजपकडे गेले म्हणजे आश्रयाला गेले आहेत. अपराध केले आहेत. त्यामुळे लपवायला गेले. लोकशाहीत अनंत काळ हे टिकत नाही. परिस्थिती बदलते. नवे लोक येतील. सत्य हे सत्यच असते, असं सूचक विधान शालिनीताई पाटील यांनी केलं.

मोदींना सत्य सांगितलं जात नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज्यातील लोक सत्य सांगत नाहीत. मोदींना हे सत्य कळेल तेव्हा ते विचार करतीलच ना. एवढे मोठे अपराध केल्यानंतर कोर्टाने एफआयआर दाखल करायला सांगितले आहेत. ही साधी गोष्ट नाही. जे संरक्षण देतील त्यांना उद्या याचा गंभीरपणे विचार करावा लागेल. त्यांनी विचार करावा अशी विनंती राहील, असंही त्या म्हणाल्या.

यामागे पवार नाही

शरद पवार यांनीच अजितदादा यांना भाजपकडे पाठवल्याची चर्चा आहे. त्यावरही त्यांनी भाष्य करताना या चर्चेत तथ्य नसल्याचं सांगितलं. शरद पवार असला प्रयोग करणार नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

जनता साथ देणार नाही

आताची परिस्थिती वेगळी आहे. ऐनवेळी शरद पवारांना सोडून जायचं होतं असं नाही. तुम्हाला भाजपकडे जायचं होतं तर भाजपच्या तिकीटावर उभं राहा. किंवा तुम्हाला वेगळा पक्ष काढायचा असेल तर वेगळा पक्ष काढून लढा. तुमच्या वागण्याला तात्त्विक बेस नाहीये. तुम्ही दरोडे घालून आलाय आणि संपत्ती लुटण्यासाठी सत्तेचा कौल मागत आहात. हे वर्षभरात जनतेपर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. आणि जनता त्यांना साथ देणार नाही, असंही त्या म्हणाल्या.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.