AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हाँ! मी अमित शाह आणि उद्योगपतींना भेटलो…’, अजित पवारांच्या वक्तव्यावर शरद पवारांचं स्पष्टीकरण

निवडणूक 2024 ची आहे, पण राजकारण 2019 च्या विधानसभा निवडणुकीवरुन सुरु आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी ज्या घटना घडल्या आहेत त्यावरुन अजित पवार यांनी शरद पवार यांच्याबाबत दावा केलाय. त्या दाव्यावर शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

'हाँ! मी अमित शाह आणि उद्योगपतींना भेटलो...', अजित पवारांच्या वक्तव्यावर शरद पवारांचं स्पष्टीकरण
शरद पवार, देवेंद्र फडणवीस, अजित पवार
| Updated on: Nov 14, 2024 | 4:29 PM
Share

विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे सहा दिवस शिल्लक आहेत. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वाकयुद्ध रंगल्याचं बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे निवडणूक 2024 ची आहे, पण राजकारण 2019 च्या विधानसभा निवडणुकीवरुन सुरु आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी ज्या घटना घडल्या आहेत त्यावरुन अजित पवार यांनी शरद पवार यांच्याबाबत दावा केलाय. त्या दाव्यावर शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार उद्योगपती गौतम अदानी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले होते, असा दावा अजित पवारांनी पुन्हा एकदा केला आहे. विशेष म्हणजे संबंधित बैठकीनंतरच आपण भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सरकार स्थापन केलं होतं, असा दावा अजित पवारांनी केलाय. पण शरद पवारांनी संबंधित दावा फेटाळला आहे.

“विधानसभा निवडणुकीनंतर मी अनेक केंद्रीय मंत्री आणि उद्योगपतींना भेटलो होतो, पण कोणत्याही प्रकारे सरकार बनवण्याबाबत चर्चा झाली नव्हती. या भेटीगाठींवेळी अजित पवारही माझ्यासोबत होते. त्यावेळी केवळ महाराष्ट्र आणि कृषी विभागाशी संबंधित चर्चा झाली होती”, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. अजित पवारांच्या वक्तव्याच्या बातम्या समोर आल्यानंतर आता त्यांनीदेखील आपल्या वक्तव्यावर पलटी घेतली आहे. आपल्या वक्तव्याला मोडूनतोडून दाखवल्याचा आरोप अजित पवारांनी केला आहे. गौतम अदानी यांचा राजकारणाशी काहीच संबंध नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत. तसेच शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनीदेखील आपल्याला या भेटीबाबत काहीच कल्पना नसल्याचं म्हटलं आहे.

अजित पवार आता काय म्हणाले?

अजित पवार यांनी बीडमध्ये प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, “माझ्या वक्तव्याला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं. गौतम अदानी आणि त्यावेळच्या सरकार स्थापनेचा दुरान्वयही संबंध नाही. लोक तथ्यांना चुकीच्या पद्धतीने सादर करत आहेत. त्यांना राजकारणाशी काहीच देणंघेणं नाही.” अजित पवार यांच्या या वक्तव्याने त्यांनी अदानी यांच्याबाबतच्या वक्तव्यावर माघार घेतल्याचं चित्र आहे. पण त्यांनी भाजप नेत्यांसोबत सरकार स्थापनेबाबत चर्चा झाल्याचा दावा फेटाळलेला नाही.

भाजपसोबत शरद पवारांनी खरंच चर्चा केली होती का?

महाराष्ट्र विधानसभेची 2019 ची निवडणूक ही प्रचंड राजकीय घडामोडींची ठरली होती. निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने शिवसेना मुख्यमंत्रीपदाच्या भूमिकेवर ठाम राहिली. महायुतीत अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा निर्णय झाला होता, असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. शिवसेनेचा हा दावा भाजपला मान्य नव्हता. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या नेत्यांमध्ये भेटीगाठी झाल्या. या तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. ठरल्यानुसार तीनही पक्षांचे नेते रात्रीच्या बैठकीनंतर सकाळी राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करणार होते. पण त्याआधीच अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेच मंत्रिपदाची शपथ घेतली होती.

या घटनेमुळे महाराष्ट्राची जनता देखील चक्रावली होती. राजकारणात काय सुरु आहे? असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर या घटनेमुळे शरद पवारांवरचा दबाव वाढला. त्यामुळे शरद पवारांनी आपण अजित पवार यांच्या भूमिकेसोबत नसल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर अवघ्या 36 तासांत शिवसेनाज-राष्ट्रवादीचं सरकार कोसळलं होतं. त्यानंतर ठरल्यानुसार महायुतीचं सरकार कोसळलं होतं. पण त्यानंतर दोन वर्षांनी देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही 9 च्या मुलाखतीत शरद पवार यांच्यासोबत सरकार स्थापनेबाबत 2019 मध्ये बैठका झाल्याचं सांगत राजकारणात खळबळ उडवून दिली होती. यानंतर शरद पवारांनी देखील आपण गुगली टाकण्यासाठी आणि भाजपचं खरं रुप दाखवण्यासाठी त्यांना भेटल्याचं शरद पवारांनी जाहीर केलं होतं.

काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.