AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूर्वी परातीत चहा यायचा नंतर कप आले, त्याचा कान तुटलेला, ती परिस्थिती सहकार क्षेत्रानं बदलली: शरद पवार

श्रीगोंदा येथील तत्त्वनिष्ठ व संयत नेतृत्व माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, यांच्या उपस्थितीत करण्यात आलं.

पूर्वी परातीत चहा यायचा नंतर कप आले, त्याचा कान तुटलेला, ती परिस्थिती सहकार क्षेत्रानं बदलली: शरद पवार
sharad pawar
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Nov 07, 2021 | 2:51 PM
Share

अहमदनगर : श्रीगोंदा येथील तत्त्वनिष्ठ व संयत नेतृत्व माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. शरद पवार यांनी यावेळी माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या आठवणी जागवल्या. अहमदनगरमधील पाण्याचा संघर्ष, सहकारानं शेतकऱ्यांच्या जीवनात घडवून आणलेला बदल, साखर कारखान्यांसमोरील आव्हानं यांसदर्भात भाष्य केलं. शरद पवार यांनी ग्रामीण भाग सहकारामुळं कसा बदलला याचं उदाहरण देऊन सांगितलं. पूर्वी परातीत चहा यायचा नंतर कप आले पण त्याचा कान तुटलेला होता, पण आज परिस्थिती बदलली आहे. हे चित्र बदलण्यास सहकार उद्योग कारणीभूत आहे, असं शरद पवार म्हणाले.

माझ्या पहिल्या निवडणुकीत तालुक्यात फक्त 6 गाड्या होत्या

शरद पवार म्हणाले की, पूर्वी कारखान्याच्या कार्यक्रमाला लोक ट्रॉलीत यायचे, पण आता चित्र बदललं आहे. 1967 साली मी पहिल्यांदा विधानसभेला उभा होतो तेंव्हा माझ्या तालुक्यात फक्त सहा गाड्या होत्या. पूर्वी परातीत चहा यायचा नंतर कप आले पण त्याचा कान तुटलेला होता, पण आज परिस्थिती बदलली आहे. हे चित्र बदलल याला कारण सहकार उद्योग आहे, असं शरद पवार म्हणाले.

आज नव्या वर्षाच्या सुरुवातीचा पहिला दिवस, आज बापूंच्या आठवण करण्याचा दिवस, त्यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी आपण एकत्र आलो आहोत. बापूंच्या डोक्यावर टोपी कधीच असायची नाही, पण इथे पुतळ्यावर टोपी आहे. पण हा पुतळा साक्षात शिवाजीराव नागवडे उभे आहेत अस वाटतं असल्याचं पवार म्हणाले.

लग्न लागल्यानंतर पाणी प्रश्नावर भाषण व्हायची

नगर जिल्ह्यात खूप जागृती असते, पाण्याच्या प्रश्नवरून या जिल्ह्यात खूप वाद व्हायचे. इथे लग्नानंतर भाषणे करायची पद्धत होती. अहमदनगरचा दुष्काळ पाहण्यासाठी इंदिरा गांधी आणि पंडित नेहरू आले होते. पण, आता पाणी आलं आहे. परिस्थिती बदलली आहे. माझा नातू रोहित पवारने कर्जत जामखेडचे पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले, कुकडीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली, येत्या दोन ते तीन आठवड्यात बैठक घेऊन आम्ही पाण्याचा प्रश्न सोडवू, असं शरद पवार म्हणाले.

शेतकऱ्यांना जादा पैसे मिळणार

सध्या साखर उद्योग अडचणीतून जात आहे.आता आपण वीज आणि इथेनॉल साखर कारखान्यात तयार करतो. इथेनॉल पेक्षा एक नवीन पदार्थ हायड्रोजन आला आहे. त्यावर आमचा अभ्यास सुरू आहे ते जर सुरू झालं तर शेतकऱ्यांना टनामध्ये जास्त पैसे मिळतील. वीज आणि इथेनॉल मुळे दीडशे ते दोनशे रुपये जास्तीचे शेतकऱ्यांना मिळणार आहेत, असं शरद पवार म्हणाले.

इतर बातम्या:

अस्लम शेख यांचे काशिफ खानशी संबंध काय? मलिक यांचे आरोप गंभीर, कॉल रेकॉर्ड चेक करा; मोहित कंबोज यांची मागणी

सॅमचं खरं नाव काय?, डिसूझा आणि एनसीबी अधिकाऱ्याच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप जारी; मलिक यांचा नवा धमाका

VIDEO | धनंजय मुंडेंतर्फे आयोजित कार्यक्रमात सपना चौधरीचे ठुमके, मेटे म्हणतात, सामाजिक मंत्र्यांचं भान…

Sharad Pawar said Cooperative industry change the picture of rural Maharashtra

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत