AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदींकडून तब्येतीची चौकशी, शरद पवारांची 2 शब्दांत प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?

तप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार शरद पवार यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे. ऑपरेशन सिंदूरसंदर्भात भारताची बाजू जगभरात मांडण्यासाठी खासदारांचं एक शिष्टमंडळ परदेशवारीला गेलं होतं.

मोदींकडून तब्येतीची चौकशी, शरद पवारांची 2 शब्दांत प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
sharad pawar and narendra modi
| Updated on: Jun 11, 2025 | 2:30 PM
Share

Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार शरद पवार यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे. ऑपरेशन सिंदूरसंदर्भात भारताची बाजू जगभरात मांडण्यासाठी खासदारांचं एक शिष्टमंडळ परदेशवारीला गेलं होतं. यात खासदार सुप्रिया सुळे यांचाही समावेश होता. हे शिष्टमंडळ भारतात परतल्यानंतर मोदी आणि या खासदारांत चर्चा झाली. यावेळी मोदी यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे शरद पवार यांच्या तब्येतीविषयी चौकशी केली. यावरच आता खुद्द शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अवघ्या दोन शब्दांत दिली प्रतिक्रिया

शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. पत्रकारांनी त्यांना नरेंद्र मोदी यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे तुमच्या प्रकृतीची चौकशी केली आहे, त्याबाबत तुमचे मत काय? असा प्रश्न विचारला. यावर बोलताना त्यांनी अवघ्या दोन शब्दांत प्रतिक्रिया दिली. त्यांनी माझी चौकशी केली असेल तर ठिक आहे, त्यांचा आभारी आहे, असं शरद पवार यांनी म्हटलंय.

शरद पवार यांच्या पक्षाची वेगळी भूमिका

काही दिवसांपूर्वी ऑपरेशन सिंदूरप्रकरणी विरोधकांनी विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली होती. ऑपरेशन सिंदूरमध्ये नेमकं काय घडलं? सरकारने नेमकं काय केलं? हे मोदी सरकारने सांगावे. विरोधकांना विश्वासात घेण्यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी विरोधकांनी केली होती. त्यासाठी वेगवेगळ्या विरोधी पक्षांनी मोदी यांना पत्रही लिहिले होते. शरद पवार यांच्या पक्षाने मात्र वेगळी भूमिका घेतली होती. सध्या विशेष अधिवेशन बोलवणे योग्य नाही. आपण एकजूट आहोत हा संदेश जाणे गरजेचे आहे असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांच्याकडे नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे.

पवारांच्या पक्षात बदलाचे वारे

दरम्यान, राष्ट्रवादी ( शरद पवार गट)  पक्षात बदलाचे मेोठे वारे वाहात आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मला जबाबदारीतून मुक्त करून नव्या नेतृत्त्वाला संधी द्या, अशी भावना व्यक्त केली आहे. त्यानंतर आता नव्या प्रदेशाध्यक्षांचा शोध घेतला जाईल, असे शरद पवार यांनी म्हटलंय त्यामुळे आता शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद कोणाकडे जाईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत