AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde: संजय राऊतांनी दिलेल्या तीन कबुली, ज्यामुळे एकनाथ शिंदेंच्या बंडावर शिक्कामोर्तब होतंय, शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर

Eknath Shinde: शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बोलता बोलता काही संकेतही दिले आहेत. मुख्यमंत्री अनेक खात्यांचा आढावा घेत असतात.

Eknath Shinde: संजय राऊतांनी दिलेल्या तीन कबुली, ज्यामुळे एकनाथ शिंदेंच्या बंडावर शिक्कामोर्तब होतंय, शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 21, 2022 | 11:42 AM
Share

मुंबई: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी पक्षातच बंड केल्याने एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले आहेत. शिंदे यांनी आपल्याच सर्वोच्च नेत्याच्या नेतृत्वाखालील सरकारला सुरुंग लावण्याचं काम केलं आहे. शिंदे यांच्या या बंडाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनीही गंभीर दखल घेतली आहे. शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी स्वत: मीडियासमोर येऊन शिंदे यांच्या बंडावर भाष्य केलं आहे. यावेळी राऊत यांनी शिंदे यांना निष्ठावंत शिवसैनिक असल्याचं सांगत ते बंड करणार नाहीत, असं वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला. पण याचवेळी त्यांनी बंड झाल्याची कबुलीही दिली. त्यामुळे शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं दिसून येत आहे. संजय राऊत यांच्या या कबुलीमुळे केवळ शिवसेनाच फुटीच्या उंबरठ्यावर नाही तर महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचे संकेतही मिळत आहेत.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बोलता बोलता काही संकेतही दिले आहेत. मुख्यमंत्री अनेक खात्यांचा आढावा घेत असतात. तसे ते अनेक खात्यांचा घेतात. त्यातून काही गैरसमज असतील तर दूर करू, माझं आणि शरद पवारांचं बोलण सुरू आहे. पवार आता दिल्लीत पोहोचतील. उद्धवजी मला म्हणाले इथेच थांबा. म्हणून मी इथे आहे. पक्षप्रमुखांशी आणि आम्ही सर्व सहकारी एकमेकांशी बोलतोय. राजकारणात अशा प्रसंगांना समोर जावं जागतं. भाजपने आधीही एक प्रयोग केला. तो यशस्वी झाला नाही. म्हणून थांबून हा दुसरा घाव पाठीवर घालत आहेत. आम्ही छातीवर घाव घेणारे आहोत. एकनाथ शिंदेंचं आयुष्य हे शिवसेनेत गेलं आहे. सर्व आंदोलनात ते बरोबर होते. बाळासाहेबांबरोबर होते. ते दबाव आणत आहेत. अनिल परबांना आजच ईडीची नोटीस का? हे समजून घेतलं गेलं पाहिजे, महाराष्ट्र अस्थिर करण्याचं काम होतंय, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

पहिली कबुली

एकनाथ शिंदे हे मुंबईच्या बाहेर आहेत. त्यांच्याशीही संपर्क झाला आहे. या सर्वांना गुजरातमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यातील काही आमदारांना परत यायचं आहे. पण त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. त्यांना परत येऊ दिलं जात नाही. मध्यप्रदेश आणि राजस्थान पॅटर्न करण्याचा हा प्रयत्न आहे, असं संजय राऊत यांनी सांगून राज्यात बंड झाल्याची कबुली दिली आहे.

दुसरी कबुली

एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले हे सर्व आमदार जुने शिवसैनिक आहेत. शिवसेनेच्या पडत्या काळातही ते आमच्या सोबत होते. ते निष्ठावंत आहेत, ते परत येतीलच, असंही सांगून राऊत यांनी निष्ठावंत आमदारही शिंदे यांच्यासोबत असल्याचं सांगितलं जात आहे.

तिसरी कबुली

जे आमदार इथे नाहीत ते सांगतात की आम्हाला काय झालंय कळत नाही. हे आमदार गुजरातमध्ये, सुरतमध्ये आहेत. त्या आमदारांची व्यवस्था भाजप नेते आरसी पाटील करत आहे. सुरतलाच का नेलं? ज्या क्षणी आमचा संपर्क होईल त्या क्षणी ते परत येतील, असं विधान करत राऊत यांनी शिवसेनेत मोठं बंड झाल्याचं स्पष्ट केलं आहे. या बंडाचे कर्तेकरविते एकनाथ शिंदे असल्याचंही त्यांनी अप्रत्यक्षपणे स्पष्ट केलं आहे.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.