AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्रातच, महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा बदलला पाहिजे : संजय राऊत

शिवसेना-भाजपमधील सत्तास्थापनेच्या तणावामध्ये संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut PC) आक्रमकपणे शिवसेनेची बाजू लावून धरत आहेत.

महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्रातच, महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा बदलला पाहिजे : संजय राऊत
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Nov 05, 2019 | 10:02 AM
Share

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut PC) यांच्या मॅरेथॉन पत्रकार परिषदा सुरुच आहेत. शिवसेना-भाजपमधील सत्तास्थापनेच्या तणावामध्ये संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut PC) आक्रमकपणे शिवसेनेची बाजू लावून धरत आहेत. संजय राऊत यांनी आजही पत्रकार परिषद घेऊन, काल घेतलेल्या राज्यपालांच्या भेटीसंदर्भात माहिती दिली.  मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, हे संजय राऊत यांनी आजही छातीठोकपणे सांगितलं. मात्र त्याचवेळी राऊत यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा बदलला पाहिजे, असं म्हणत, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

संजय राऊत आणि सेना नेते रामदास कदम यांनी काल राज्यपालांची भेट घेतली. याबाबत राऊत म्हणाले, “काल राज्यपालांसोबत राज्यातील परिस्थितीबाबत बोललो आहोत. आमची भूमिका मांडली. रोज बोलणं आता योग्य नाही. महाराष्ट्र राजकारणाचा चेहरा बदलला पाहिजे. सरकार लवकर स्थापन होईल. मुख्यमंत्री सेनेचा होईल”.

सर्व पक्षाचे नेते प्रयत्न करत आहेत. सर्वांची भूमिका आता महत्वाची आहे. महाराष्ट्राचा निर्णय हा महाराष्ट्रात होईल. महाराष्ट्रामध्ये स्थिर सरकार यावं हे पवारांना आणि काँग्रेसच्या नेत्यांना वाटतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सुद्धा स्थिर सरकार हवं आहे. दिल्लीत काय झालं मला माहित नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

मी पक्षासाठी बोलतोय , पक्षप्रमुखांना खोटं ठरवलं जात आहे. जे ठरलं होतं यावर कोणी बोलत नाही. कोणीही टीका करु दे, जनतेला सर्व माहीत आहे.

शरद पवारांसोबत आता काही बोलणं झालं नाही. पण जर बोललो तर अपराध आहे का? जे कोणी पवारसाहेबांसोबत बोलत आहेत हे आम्हाला माहीत आहे. फक्त आम्ही बोललो की दिसतं, असंही संजय राऊत यांनी नमूद केलं. शपथ ग्रहण होईल आणि राज्यावर जे ग्रहण लागलं आहे ते सुटेल, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या 

‘तरुण भारत’ माहित नसणारे संजय राऊत ‘अधू दृष्टीचे’, मुखपत्रांमध्ये कलगीतुरा 

VIDEO: ‘ती’ फाईल दुर्दैवाने समोर आली, लवकरच खुलासा होईल : संजय राऊत 

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...