AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तरुण भारत’ माहित नसणारे संजय राऊत ‘अधू दृष्टीचे’, मुखपत्रांमध्ये कलगीतुरा

तरुण भारत' माहित नाही, असं म्हणणारे संजय राऊत ‘अधू दृष्टीचे' आहेत, अशा शब्दात 'तरुण भारत'च्या अग्रलेखातून राऊतांचा समाचार घेण्यात आला आहे.

'तरुण भारत' माहित नसणारे संजय राऊत ‘अधू दृष्टीचे', मुखपत्रांमध्ये कलगीतुरा
| Updated on: Nov 05, 2019 | 8:29 AM
Share

नागपूर : शिवसेना आणि भाजपमध्ये रंगणारी खडाजंगी कमी होती की काय, म्हणून आता शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ आणि रा. स्व. संघाचे मुखपत्र ‘तरुण भारत’ यांच्यामध्येही कलगीतुरा रंगत आहे. ‘तरुण भारत’ माहित नाही, असं म्हणणारे संजय राऊत ‘अधू दृष्टीचे’ आहेत, अशा शब्दात ‘तरुण भारत’च्या अग्रलेखातून राऊतांचा समाचार (Tarun Bharat on Sanjay Raut) घेण्यात आला आहे.

एका अग्रलेखावरुन एखादा माणूस इतका अस्वस्थ होईल, की महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तपत्रांची नावंही विस्मरणात जातील, असं आम्हाला कधीही वाटलं नव्हतं, असा टोला संजय राऊत यांना लगावण्यात आला आहे. तरुण भारत माहिती नाही, असं सांगून एकप्रकारे आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचं महाराष्ट्रासमोर प्रदर्शन करणाऱ्या स्वयंघोषित अनुभवी पत्रकाराचे अभिनंदनच करावे लागेल, असा टोमणाही संजय राऊत यांना मारण्यात आला आहे.

‘रोज अग्रलेख लिहा, 9 वाजता पत्रकार परिषद घ्या, ‘विक्रम-वेताळ’नंतर आता ‘उद्धव-बेताल’ची कथा’

महाराष्ट्राची जनता विक्रमाच्या रुपाने प्रश्न विचारत आहे आणि त्याची उत्तरं देणं सोडून आपलं अज्ञान प्रगट करण्याचं काम होत आहे. आता यांच्या 175 आमदारांच्या पाठिंब्यावर खुद्द शरद पवार यांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे, असं म्हणत ‘तरुण भारत’मधून राऊतांच्या वक्तव्याची खिल्ली उडवण्यात आली आहे.

संपादक हा वाचकसंख्येचा लोकप्रतिनिधी असतो. त्यांची जनभावना टिपणे आणि ती सत्ताधाऱ्यांकडून पूर्ण करुन घेणे, हे संपादकांचे आद्यकर्तव्य असते, असं सांगत संजय राऊत यांना वृत्तपत्राच्या संपादकपदाच्या जबाबदारीचीही आठवण करुन देण्यात आली आहे.

‘रोज अग्रलेख लिहिणं आणि नंतर 9 वाजता पत्रकार परिषद घेत फिरणं, बातम्या पेरणं यामध्ये आणि महाराष्ट्रासारख्या राज्याचा कारभार चालवून दाखवणं यामध्ये अंतर समजून घेण्याची ज्यांच्यात क्षमता नाही, त्यांच्याकडून ती अपेक्षा तरी कशी करायची?’ असा टोला संजय राऊत यांना काल ‘तरुण भारत’ मधून (Tarun Bharat on Sanjay Raut) लगावण्यात आला होता. त्यानंतर ‘तरुण भारत’ हे वृत्तपत्र आपल्याला माहिती नाही, अशी उपरोधिक प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती.

Follow Us
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.