AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“माझी बायको माझं ऐकत नाही, वाऱ्यावर सोडलीय, म्हणून तुम्ही खपवून घेता”, दिपाली सय्यदचा फडणवीसांना पुन्हा सवाल

"माझी बायको माझं ऐकत नाही, वाऱ्यावर सोडलीय, म्हणून तुम्ही खपवून घेता. अमृता फडणवीस मुख्यमंत्र्यांवर टीका करतात त्यांना कुणी बोलत नाही, मग मला रोखण्याचा अधिकार नाही", असं दिपाली सय्यद यांनी म्हटलंय.

माझी बायको माझं ऐकत नाही, वाऱ्यावर सोडलीय, म्हणून तुम्ही खपवून घेता, दिपाली सय्यदचा फडणवीसांना पुन्हा सवाल
| Updated on: May 30, 2022 | 8:02 PM
Share

मुंबई : “माझी बायको माझं ऐकत नाही, वाऱ्यावर सोडलीय, म्हणून तुम्ही खपवून घेता. अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात त्यांना कुणी बोलत नाही, मग मला रोखण्याचा अधिकार नाही”, असं अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Devendra Fadanvis) यांनी म्हटलंय. त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सवाल विचारलाय.

दिपाली सय्यद काय म्हणाल्या?

“माझी बायको माझं ऐकत नाही, वाऱ्यावर सोडलीय, म्हणून तुम्ही खपवून घेता. अमृता फडणवीस मुख्यमंत्र्यांवर टीका करतात त्यांना कुणी बोलत नाही, मग मला रोखण्याचा अधिकार नाही”, असं दिपाली सय्यद यांनी म्हटलंय.

आपल्या मुख्यमंत्र्याबद्दल हे सर्व बोललं जातंय. हे आम्ही खपवून घेणार नाही. त्यांना जश्यास तसं मी दिलंय. पंतप्रधानांवर बोललं तर यांना झोमतं मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल हे कुठल्या अधिकारवाणीने बोलतात? त्यांचं बोलणं चालतं का?, त्यांना कुणी विचारत नाही, असंही त्या म्हणाल्या आहेत.

“भाजपच्या कार्यकर्ते आणि नेते मुखमंत्र्यांना काहीही बोलतात हे पद नाही आहे का त्यांची भाषा कशी याला आपण प्रतिउत्तर करतोय तर तूम्ही मला मारणार का? भाजप क्राईमचा डोंगर आहे. या माझ्या घरात बघुयात मग…”, असं म्हणत दिपाली सय्यद यांनी भाजपला आव्हान दिलंय.

दिपाली सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल

दिपाली सय्यद यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींवरआक्षेपार्ह भाषेत टीका करणं चांगलंच महागात पडलं आहे. दिपाली सय्यद यांच्याविरोधात मुंबईतील  ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपाली यांनी ट्विट करत पंतप्रधानांवर जोरदार टीका केली होती. त्यांचं हे ट्विट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं होतं. भाजपमध्ये घोटाळेबाज मंत्र्यांना पाठिंबा दिला जातो असं म्हणत त्यांनी मोदींवर टीका केली होती. “किरीट सोमय्याने आरोप केल्यानंतर मंत्री बीजेपीमध्ये जाऊन पवित्र होतात. मग पंतप्रधान त्यांना पाठिंबा देतात. त्यांच्या घोटाळ्याबाबत नंतर त्यांना कुणीच काही बोलत नाही. असा —- (आक्षेपार्ह शब्द) पंतप्रधान अख्ख्या भारताने पाहिला नसेल”, असं त्यांनी म्हटलं होतं.

चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान.
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य.
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?.
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट.
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ.
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ट्रॅफिक पोलिस सरसावले
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ट्रॅफिक पोलिस सरसावले.
नार्वेकरांना अधिकार देणं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेची धुरा डाकू....
नार्वेकरांना अधिकार देणं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेची धुरा डाकू.....
आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार
आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीस आणि अमित शाह यांची दिल्लीत बैठक
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीस आणि अमित शाह यांची दिल्लीत बैठक.
सावरकरांवरील माझा लेख मोहन भागवतांनी वाचला नसावा
सावरकरांवरील माझा लेख मोहन भागवतांनी वाचला नसावा.