AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गट रस्त्यावर! मुंबई, नाशिक, औरंगाबादेत लोढांविरोधात आंदोलन, चौथीचं पुस्तक भेट, राजीनामा द्या, अन्यथा… काय दिला इशारा?

मंगल प्रभात लोढा यांना चौथीतल्या इतिहासाचं पुस्तक यावेळी भेट म्हणून देणार असल्याचंही आंदोलकांनी सांगितलं.

ठाकरे गट रस्त्यावर! मुंबई, नाशिक, औरंगाबादेत लोढांविरोधात आंदोलन, चौथीचं पुस्तक भेट, राजीनामा द्या, अन्यथा... काय दिला इशारा?
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Dec 01, 2022 | 12:36 PM
Share

मुंबईः केंद्रीय पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे (Shivsena Thackeray) गट चांगलाच आक्रमक झाला आहे. मुंबई आणि औरंगाबादेत शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन केलं जातंय. छत्रपती शिवरायांची तुलना एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्याशी करणाऱ्या मंगल प्रभात लोढा यांनी आधी राजीामा द्यावा. अन्यथा त्यांना मुंबईत फिरू देणार नाही, असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आलाय. मुंबईत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली.

मंगल प्रभात लोढा यांना चौथीतल्या इतिहासाचं पुस्तक यावेळी भेट म्हणून देणार असल्याचंही आंदोलकांनी सांगितलं.  हे पुस्तक वाचलं तरी छत्रपती शिवरायांचा नेमका इतिहास त्यांना कळून जाईल, असं मत अरविंद सावंत यांनी व्यक्त केलं.

औरंगाबादमध्येही ठाकरे गटाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. विधान सभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं आहे. सध्या शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत. त्यामुळे आज औरंगाबादेत चक्का जाम आंदोलन करण्यात आलं, असं अंबादास दानवे म्हणाले.

राज्यात मोघलाई आहे, एकीकडे सरकार सांगतं एक बील भरा.. .पण शेतकऱ्याला एक बिल भरणं आताच्या घडीला शक्य नाही. सरकराला कुठलीही भाषा कळत नाही, म्हणून आम्ही रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला, असं अंबादास दानवे म्हणाले.

नाशिकमध्येही आंदोलन…

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध केला गेला. नाशिकरोड शिव जन्मोत्सव समितीच्यावतीने अभिनव आंदोलन करण्यात आलं.. यावेळी कार्यकर्त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना हटवण्यासाठी थेट राष्ट्रपतींनाच पत्र लिहिले.. यावेळी एक प्रतिकात्मक पत्रपेटी तयार करण्यात आली असून या पत्रपेटीमध्ये हजारहून अधिक पत्र जमा करण्यात आले आहेत..

Follow Us
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल, रोजगार टिकवण्यासाठी उपाययोजनांची मागणी
भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या...
Pune | भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारावर हिंदू महासभेचे आनंद दवे आक्रमक
फडणवीसांचे उत्तर: चाकण MIDC मधील ७६% बंद कंपन्या ‘डिफंक्ट’ होत्या
चाकण एमआयडीसीतील कंपन्या बंद: फडणवीसांनी पवारांना दिले उत्तर
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके