AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेला पटकनेवाला पैदा नहीं हुआ, उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर निशाणा

मुंबई : शिवसेनेला पटकनेवाला पैदा नहीं हुआ, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या ‘पटक देंगे’ या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले. आम्हाला कुणी लेचेपेचे समजू नये. कित्येक लाटा आल्या आणि गेल्या, लाटा वैगरे आमच्या समोर नको, ही आमची भगवी लाट आहे. काहीजण काम न करता टिमकी वाजवतात, छत्रपतींचं नाव घेऊन खोटं […]

शिवसेनेला पटकनेवाला पैदा नहीं हुआ, उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर निशाणा
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM
Share

मुंबई : शिवसेनेला पटकनेवाला पैदा नहीं हुआ, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या ‘पटक देंगे’ या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले. आम्हाला कुणी लेचेपेचे समजू नये. कित्येक लाटा आल्या आणि गेल्या, लाटा वैगरे आमच्या समोर नको, ही आमची भगवी लाट आहे. काहीजण काम न करता टिमकी वाजवतात, छत्रपतींचं नाव घेऊन खोटं बोलतात, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला.

मुंबईच्या वरळी येथे आयोजित स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजप सरकारवर अनेक मुद्द्यांवरुन टीकास्त्र सोडले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, “माझ्या देशाचे काय होणार हा प्रश्न सध्या कुणालाही पडलेला नाही. मला मतदानाच्या निकालापेक्षा माझ्या देशाचे काय होईल याची चिंता आहे. एकवेळ सरकार मजबूर नसले तरी चालेल, पण माझा देश मजबूत असला पाहिजे.”

राम मंदिराच्या मुद्दयावरुन आम्ही युती केली होती. मात्र 15  लाख रूपये खात्यात जमा होतील हा जुमला होता, अच्छे दिन हा जुमला होता, मग राम मंदिराचा मुद्दाही निवडणुकीसाठी जुमलाच आहे का? असा घाणाघात उद्धव ठाकरेंनी भाजपवर केला.

उद्धव ठाकरेंच्या सभेतील महत्त्वाचे मुद्दे

– लोकाधिकारचा मावळा हातात घेतलेलं काम पूर्ण केल्याशिवाय परतत नाही

– काही जण काही काम न करता नुसती टिमकी वाजवतात

– पुढची सर्व वर्ष आपली असणार

– शेतकऱ्याला प्रमाण पत्र मिळालं पण कर्ज मिळालं नाही, हे मी उघड केल्यानंतर चार ते पाच तासात असा काय दणका बसला की मुंबईमधून हलचाली झाल्या आणि त्याच्या खात्यात पैसे जमा झाले

– माझ्या देशाचे काय होणार हा प्रश्न सध्या कुणाला पडलेला नाही. मला मतदानाच्या निकाला पेक्षा माझ्या देशाचे काय होईल याची चिंता आहे

– एकवेळ सरकार सरकार मजबूर नसले, तरी चालेल पण माझा देश मजबूत असला पाहिजे

– शिवसेनेला पटकणार कोणी पैदा झाला नाही

– लाटा वैगरे आमच्या समोर नको ही आमची भगवी लाट आहे

काय म्हणाले होते अमित शाह? 

‘युती झाली तर ठिक, अन्यथा विरोधकांसारखं मित्रपक्षाला (शिवसेना) अस्मान दाखवू’, असं वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केलं होतं. मराठवाड्यातील बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अमित शाहांनी युतीच्या संभ्रमात राहू नका, असं स्पष्ट केलं होतं. यावरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं होतं.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.