AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारणापलीकडचे देवेंद्र फडणवीस, वडिलांचा कॅन्सरने मृत्यू, कॅन्सरग्रस्तांसाठी नागपुरात उभारलं मोठं रुग्णालय

एक राजकीय नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांना अवघा देश ओळखतो, पण आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजकारणापलीकडचे देवेंद्र फडणवीस

राजकारणापलीकडचे देवेंद्र फडणवीस, वडिलांचा कॅन्सरने मृत्यू, कॅन्सरग्रस्तांसाठी नागपुरात उभारलं मोठं रुग्णालय
Devendra fadnavis
| Edited By: | Updated on: Jul 22, 2021 | 4:28 PM
Share

नागपूर : वडिलांना कॅन्सर…मग उपचारासाठी नागपूरवरुन मुंबईच्या टाटा हॉस्पिटलमध्ये जाणं, तिथे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे होणारे हाल. पुढे कॅन्सरने वडिलांचा मृत्यू…. अशाचप्रकारे कॅन्सर रुग्णांवर उपचारासाठी विदर्भातील लोकांना मुंबईत जावं लागू नये, म्हणून त्यांनी नागपुरात मोठं नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारलं… हा नेता दुसरा कुणी नसून, राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आहे. एक राजकीय नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांना अवघा देश ओळखतो, पण आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजकारणापलीकडचे देवेंद्र फडणवीस…, यावर ‘टीव्ही 9 मराठी’चा हा रिपोर्ट….

मध्य भारतातल्या कॅन्सर रुग्णांचा मोठा आधार

चार टर्मचे आमदार, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते आणि भाजपचा राज्यातील आक्रमक चेहरा… देवेंद्र फडणवीस यांचा हा राजकीय परिचय. पण या राजकारणापलीकडेही एक आरोग्य सेवक म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. वडील गंगाधरराव फडणवीस यांना कॅन्सरने ग्रासलं, मुंबईत जाऊन वडिलांवर उपचार करण्यासाठी फडणवीस कुटुंबीयांना मोठे हाल सहन करावे लागले. कन्सरमुळेच वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे आपल्याला झालेला त्रास विदर्भातील कन्सरग्रस्तांना होऊ नये. म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारलं. जवळपास 25 एकर कॅम्पस, 450 पेक्षा जास्त बेड, कॅन्सर उपचारासाठी अत्याधुनिक सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांमुळे आज नॅशनल कॅन्सर इन्स्टीट्यूट विदर्भच नाही, तर मध्य भारतातल्या कॅन्सर रुग्णांचा मोठा आधार ठरतो आहे.

कॅन्सर सर्वात स्वस्त उपचार, देवेंद्र फडणवीस यांचा सकल्प

देशात कॅन्सरचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गेल्यावर्षाचा देशभरातल्या कॅन्सर रुग्णांचा आकडा 12 लाख 90 हजारांपर्यंत पोहोचला आणि 2025 पर्यंत देशात वर्षाला 15 लाखांच्यावर कॅन्सर रुग्णसंख्या जाईल, अशी भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच मध्य भारतातल्या रुग्णांना चांगल्या दर्जाचा उपचार मिळावा, म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची उभारणी केली. देशात कॅन्सर सर्वात स्वस्त उपचार इथे व्हावा, यासाठी प्रयत्न करत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांचा सकल्प आहे.

समाजाची सेवा करणाऱ्या नेत्यांची देशात मोठी परंपरा

राजकारणात एक दुसऱ्यांवर टीका टिप्पणी, आरोप, विरोध, हेवेदावे… हे सगळं आलंच. पण राजकारणापलीकडे जाऊन समाजाची सेवा करणाऱ्या नेत्यांची या देशात मोठी परंपरा आहे. यात सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे. त्याच पावलावर पाऊल टाकत देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणापलीकडे एक आरोग्य सेवक म्हणून आपली ओळख निर्माण केलीय…. आशा करुन की भविष्यात गरीब कॅन्सर रुग्णांना देवेंद्र फडणवीस यांनी उभारलेल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये देशातील सर्वात स्वस्त उपचार मिळेल.

(Special Report On Devendra Fadnavis was set up large National Cancer Institute in Nagpur)

संबंधित बातम्या : 

मोरबे धरण क्षेत्रात दमदार पाऊस, धरणातील पाणीसाठा 62% टक्के, नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटतीय!

Kharghar : राज्यात पर्यटन बंदी तरीही पर्यटकांची हौस, धबधब्यावर अडकलेल्या 115 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश

“कुणी असो किंवा नसो, राज्याचं अर्थचक्र चालावं म्हणून कोव्हिडमध्येही मंत्रालयातील कार्यालय सुरु”, दादांना शुभेच्छा देताना मुख्यमंत्र्यांना टोमणा

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.