AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्पेशल रिपोर्ट: राज ठाकरेंच्या भाजप नेत्यांसोबतच्या भेटीचा अर्थ काय?

भाजपचे नेते राज ठाकरेंना भेटत आहेत. देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरेंची भेट घेऊन काही दिवस लोटत नाही तोच आता आशिष शेलार यांनीही राज ठाकरेंची भेट घेतलीय (Meeting of BJP leaders with Raj Thackeray).

स्पेशल रिपोर्ट: राज ठाकरेंच्या भाजप नेत्यांसोबतच्या भेटीचा अर्थ काय?
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jan 30, 2020 | 6:11 PM
Share

मुंबई : राज ठाकरेंनी आता हिंदुत्वाची कास धरल्याने भाजपला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या आहेत. भाजपचे नेते राज ठाकरेंना भेटत आहेत. देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरेंची भेट घेऊन काही दिवस लोटत नाही तोच आता आशिष शेलार यांनीही राज ठाकरेंची भेट घेतलीय (Meeting of BJP leaders with Raj Thackeray). या वाढत्या भेटींमुळे 9 फेब्रुवारीच्या मनसेच्या मोर्चाला भाजप छुप्या पद्धतीने सहकार्य करणार असल्याची चर्चा सुरु झालीय.

मनसेने पक्षाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच मुंबईत अधिवेशन घेतलं. त्यात पक्षाला नव्या झेंड्यासोबतच कडव्या हिंदुत्वाच्या विचारांची नवी जोडही दिली आहे. त्यानंतर मनसे पुन्हा एकदा 9 फेब्रुवारीला शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेतेही राज ठाकरेंच्या भेटी घेत असल्याने या मोर्चासाठीच काही खलबतं होत आहेत की काय? अशी शंका व्यक्त केली जात आहे.

पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांना देशातून बाहेर काढा या मागणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 9 फेब्रुवारीला मुंबईत महामोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. महाअधिवेशनात पक्षाने कात टाकलीय असून पक्षाचा झेंडा आणि अजेंडा सुद्धा बदललाय. मराठी अस्मितेवरून मनसेची आता प्रखर हिंदुत्वाकडे राजकीय वाटचाल सुरु झालीय. त्यामुळे शिवसेनेशी जवळपास 30 वर्षांचा संसार मोडलेल्या भाजपच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेला टोकाचा संघर्ष विसरुन राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढूल्या आहेत.

साधारण 2 आठवड्यांपूर्वी राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक झाली होती. बुधवारी (29 जानेवारी) सायंकाळी भाजप आमदार आशिष शेलारही राज ठाकरेंना कृष्णकुंजवर भेटले. दोघांमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाली. भाजप नेत्यांच्या या दोन्ही भेटी पूर्णपणे राजकीय विषयांवर असल्याचे सांगितले जाते. CAA आणि NRC या कायद्यांवरून देशात समर्थन आणि विरोध अशा दोन्ही बाजूने रान पेटलं आहे. असं असताना महाराष्ट्रात मनसेनं बांगलादेशी पाकिस्तानी घुसखोरांना हकलण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढणं भाजपच्या पथ्यावर पडलं आहे. कारण महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मर्यादा आल्या आहेत.

काँग्रेस, राष्ट्रवादीचा CAA आणि NRC कायद्याला विरोध असल्याने शिवसेनेची कोंडी झालीय. अशा वातावरणात राज्यात सध्या भाजप-मनसे थेट युतीची चिन्हं दिसत नसली, तरी एकमेकांना सोयीची जवळीक मात्र वाढतेय. भाजप-मनसेत नव्याने सलगीचं राजकारण सुरु झाल्यानं शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण होणं स्वाभाविक आहे. त्यामुळं शिवसेनेनं ‘जय श्रीराम’ची घोषणा देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अयोध्या वारीची पुन्हा आखणी सुरु केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सरकार किमान कार्यक्रमांवर चालवणं आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेची वाटचाल सुरु ठेवणं अशी दुहेरी कसरत उद्धव ठाकरेंना यापुढे अनेकदा करावी लागणार आहे.

व्हिडीओ:

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?

Fifa World Cup स्पेनने जिंकला पण फायदा मिया खलिफाला, एका रात्रीत मालामाल झाली, तब्बल 14 कोटी कमावलं.

Fifa World Cup स्पेनने जिंकला पण फायदा मिया खलिफाला, एका रात्रीत मालामाल झाली, तब्बल 14 कोटी कमावलं

Congress: भाजप कार्यालयाबाहेर काँग्रेस आक्रमक, कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंब्यासाठी भर पावसात आंदोलन, पोलीस येताच घडलं काय?.

Congress: भाजप कार्यालयाबाहेर काँग्रेस आक्रमक, कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंब्यासाठी भर पावसात आंदोलन, पोलीस येताच घडलं काय?

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..