AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातील बहुप्रतिक्षीत महापालिका निवडणुकांचं भवितव्य आज ठरणार? सुप्रिम कोर्टातील सुनावणीकडे लक्ष

महापालिकेच्या निवडणुका या पुढील महिन्यातच होणार की दिवाळीपर्यंत लांबल्या जाणार, यासंबधी निकाल येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. 

राज्यातील बहुप्रतिक्षीत महापालिका निवडणुकांचं भवितव्य आज ठरणार? सुप्रिम कोर्टातील सुनावणीकडे लक्ष
सुप्रीम कोर्टImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Apr 25, 2022 | 8:53 AM
Share

मुंबई : पुढे ढकललेल्या महापालिका निवडणुकांचा (Municipality Elections) प्रश्न आज निकाली निघण्याची शक्यता वर्तवली जातेय. सुप्रीम कोर्टात (Supreme Court) महापालिका निवडणूक प्रश्नी महत्त्वपूर्ण सुनावणी आज होणार आहे. मुंबई, पुण्यासह कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड यांना मिळून एकूण 20 पेक्षा अधिक महापालिकांच्या निवडणुका कधी होणार, हे आज स्पष्ट होईल, असा विश्वास व्यक्त केला जातोय. महापालिकांच्या निवडणुका आज होणार की दिवाळीपर्यंत लांबल्या जाणार, याबाबत सुप्रीम कोर्टात काय निर्णय होतो, याकडे सगळ्यांचीच नजर लागली आहे. ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यामुळे निवडणुका लांबल्या होत्या. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्या जाऊ नयेत, अशी भूमिका सर्वपक्षीयांनी घेतली. त्यानंतर वॉर्डची रचना करण्याचा अधिकारही सरकारकडे देणण्यात आला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकमताने झालेल्या या निर्णयानंतर आता पालिका निवडणुकांबाबत आज मोठी बातमी काय येते, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.

आज महत्त्वाचा निकाल

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको, असा निर्णय सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही मिळून घेतला. त्यानंतर सरकारकडे प्रभागरनचनेचे अधिकार देण्यात आले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्याच आलेल्या या निर्णयाला आव्हान देणाऱ्या वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये, यासाठी अनेक पालिकांवर पुन्हा एकदा प्रशासक नेमण्याची वेळ आली. सध्या अनेक पालिकांचा कारभार हा प्रशासकांच्या मार्फतच चालवला जातोय.

एकूण 13 याचिका या निर्णयाला विरोध करणाऱ्या होत्या. त्या सगळ्यांवर आज सुनावणी होईल. सुप्रीम कोर्टानं या याचिकांच्या अनुशंगानं राज्य सरकारकडे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितलं होतं. त्यासाठी सरकारनं सुप्रीम कोर्टाकडून वेळ मागून घेतली होती.

त्यानुसार सुप्रीम कोर्टानं 25 एप्रिल म्हणजे आजपर्यंत सुनावणी पुढे ढकलली होती. दरम्यान, आता सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भातल्या याचिकेवर काय सुनावणी होते, हे पाहणं महत्त्वाचंय. आज येणाऱ्या निकालात महापालिकेच्या निवडणुका या पुढील महिन्यातच होणार की दिवाळीपर्यंत लांबल्या जाणार, यासंबधी निकाल येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

संबंधित बातम्या :

Nagpur election : नागपूर मनपा निवडणुकीत सन्मानपूर्वक जागा दिल्या तरच काँग्रेससोबत आघाडी, दिलीप वळसे पाटील यांचे स्पष्टीकरण

Nashik Municipal Election : महापालिका प्रभागरचनेची फाइल आयुक्तांकडे; निवडणूक विभाग म्हणतो, काय करायचे सांगा!

NMC Election | निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसारच प्रभाग रचना, नागपूर मनपा प्रशासन लागले कामाला

पाहा मोठी बातमी : मुंबईत भाजपनं लावले यशवंत जाधव यांच्या घोटाळ्याच्या पोलखोलीचे बॅनर

मुंबईच्या रुईया कॉलेज परिसरात ग्रंथोत्सव 2026 ला सुरुवात
मुंबईच्या रुईया कॉलेज परिसरात ग्रंथोत्सव 2026 ला सुरुवात.
विलिनीकरण होणार की नाही? अनिल देशमुख स्पष्टच बोलले
विलिनीकरण होणार की नाही? अनिल देशमुख स्पष्टच बोलले.
राज्यातील एक सुजलाम सुफलाम जिल्हा दाखवा; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
राज्यातील एक सुजलाम सुफलाम जिल्हा दाखवा; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल.
राज्य मागे पडले; शेतकरी, बेरोजगारी, गुंतवणूक..वडेट्टीवार सरकारवर बरसले
राज्य मागे पडले; शेतकरी, बेरोजगारी, गुंतवणूक..वडेट्टीवार सरकारवर बरसले.
विरोधकांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला विरोध
विरोधकांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला विरोध.
ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय?राऊतांनी दोन शब्दात दिले उत्तर
ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय?राऊतांनी दोन शब्दात दिले उत्तर.
चंद्रपूर महापौर वादावर संजय राऊतांचा पलटवार, संपूर्ण खापर शिवसेनेवर...
चंद्रपूर महापौर वादावर संजय राऊतांचा पलटवार, संपूर्ण खापर शिवसेनेवर....
भरधाव कारच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू; नागपूरमधील दुर्दैवी घटना
भरधाव कारच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू; नागपूरमधील दुर्दैवी घटना.
मुंबई-विजयदुर्ग सागरी रो रो सेवा 1 मार्चपासून सुरू होणार
मुंबई-विजयदुर्ग सागरी रो रो सेवा 1 मार्चपासून सुरू होणार.
एकनाथ शिंदे 2 दिवसांपासून विश्रांतीसाठी दरे गावात
एकनाथ शिंदे 2 दिवसांपासून विश्रांतीसाठी दरे गावात.