AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवसभर उत्साही राहण्यासाठी सकाळी उठून पहिले करा हे काम, त्वचेसाठीही ठरेल फायदेशीर

आरोग्य तज्ञ सकाळी उठल्यावर तुम्हाला तंदुरस्त राहण्यासाठी फक्त हे काम करण्याची शिफारस करतात. ज्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश राहता. तर यामुळे तुमची त्वचा चमकदार राहण्यास देखील मदत करतात.

दिवसभर उत्साही राहण्यासाठी सकाळी उठून पहिले करा हे काम, त्वचेसाठीही ठरेल फायदेशीर
health care
| Edited By: | Updated on: Feb 22, 2026 | 7:25 PM
Share

सकाळी उठल्यावर सर्वात आधी आपण प्रत्येकजण व्यायाम, जिम, तसेच योगा असे रोजच्या रूटिंग फॉलो करतो. अशातच राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) मधील आरोग्य तज्ञ शिफारस करतात की तुमच्या दिवसाची सुरुवात एका ग्लास साधं पाणी पिऊन करावी. ही साधी सवय शरीराला त्वरित हायड्रेट करते आणि संपूर्ण दिवसासाठी ऊर्जा आणि सकारात्मकता प्रदान करते. एनएचएमच्या मते रात्रभर आपल्या शरीरात पाण्याचे सेवन होत नाही, ज्यामुळे सकाळी डिहायड्रेशन होते. एक ग्लास पाणी प्यायल्याने ही कमतरता लगेच भरून निघते आणि शरीराला पुन्हा ताजेतवाने बनवते.

आरोग्य तज्ञ सांगतात की सकाळी उठल्यावर सर्वात आधी एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी प्यावे. यामध्ये तुम्ही लिंबू किंवा मध मिक्स देखील करू शकता, परंतु साधं पाणी सर्वोत्तम आहे. खूप थंड किंवा खूप गरम पाणी पिणे टाळा. हळूहळू घोट घोट करून पाणी प्या आणि एकाच वेळी जास्त पिऊ नका. ही छोटीशी सवय तुमच्या दैनंदिन दिनचर्येत समाविष्ट केल्याने तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहू शकता. सकाळी पाण्याने सुरुवात केल्याने तुमचा संपुर्ण दिवस ताजेतवाने, ऊर्जावान आणि सकारात्मक राहते.

सकाळी रिकाम्यापोटी कोमट पाणी प्यायल्याने आरोग्यास होतात हे फायदे

पचनसंस्था

सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते, रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि रोगांशी लढण्याची क्षमता वाढवते. सकाळी पाणी प्यायल्याने आतड्यांची हालचाल उत्तेजित होते, पोट स्वच्छ राहते आणि अन्न योग्यरित्या पचण्यास मदत होते. यामुळे आम्लता आणि वायूसारख्या समस्या देखील कमी होतात, पचनसंस्था मजबूत होते.

वजन कमी होणे

सकाळी एक ग्लास पाणी वजन कमी करण्यास देखील मदत करते. सकाळी पाणी प्यायल्यामुळे चयापचय वाढते, कॅलरी बर्निंग वेगवान होते आणि भूक नियंत्रित होते, ज्यामुळे वजन कमी होण्यास हातभार लागतो. पुरेसे पाणी प्यायल्याने त्वचा हायड्रेट राहते, ज्यामुळे त्वचेवर चमकदार रंग येतो, सुरकुत्या कमी होतात आणि मुरुमांसारख्या समस्या येतात.

बद्धकोष्ठता

बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांना एक ग्लास पाणी प्यायल्याने आराम मिळतो. सकाळी पाणी प्यायल्याने आतडे हायड्रेट राहण्यास मदत होते आणि आतड्यांची हालचाल सुलभ होते. ही सवय नियमितपणे अंगीकारल्याने बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

मुंबईच्या रुईया कॉलेज परिसरात ग्रंथोत्सव 2026 ला सुरुवात
मुंबईच्या रुईया कॉलेज परिसरात ग्रंथोत्सव 2026 ला सुरुवात.
विलिनीकरण होणार की नाही? अनिल देशमुख स्पष्टच बोलले
विलिनीकरण होणार की नाही? अनिल देशमुख स्पष्टच बोलले.
राज्यातील एक सुजलाम सुफलाम जिल्हा दाखवा; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
राज्यातील एक सुजलाम सुफलाम जिल्हा दाखवा; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल.
राज्य मागे पडले; शेतकरी, बेरोजगारी, गुंतवणूक..वडेट्टीवार सरकारवर बरसले
राज्य मागे पडले; शेतकरी, बेरोजगारी, गुंतवणूक..वडेट्टीवार सरकारवर बरसले.
विरोधकांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला विरोध
विरोधकांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला विरोध.
ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय?राऊतांनी दोन शब्दात दिले उत्तर
ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय?राऊतांनी दोन शब्दात दिले उत्तर.
चंद्रपूर महापौर वादावर संजय राऊतांचा पलटवार, संपूर्ण खापर शिवसेनेवर...
चंद्रपूर महापौर वादावर संजय राऊतांचा पलटवार, संपूर्ण खापर शिवसेनेवर....
भरधाव कारच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू; नागपूरमधील दुर्दैवी घटना
भरधाव कारच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू; नागपूरमधील दुर्दैवी घटना.
मुंबई-विजयदुर्ग सागरी रो रो सेवा 1 मार्चपासून सुरू होणार
मुंबई-विजयदुर्ग सागरी रो रो सेवा 1 मार्चपासून सुरू होणार.
एकनाथ शिंदे 2 दिवसांपासून विश्रांतीसाठी दरे गावात
एकनाथ शिंदे 2 दिवसांपासून विश्रांतीसाठी दरे गावात.