AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरे बघ ही गर्दी, पाक धुरळा आहे…; सुषमा अंधारे यांनी कोणत्या केंद्रीय मंत्र्याला टोला लगावला?

मला दुसऱ्या पक्षातून आलेलं पार्सल म्हणता मग तुमच्याकडे आलेले कोण आहेत? तुमच्याकडे 50% राष्ट्रवादीचे, 25% काँग्रेसची आणि 15 टक्के आमचे भाऊ तुमच्याकडे आले आहेत.

अरे बघ ही गर्दी, पाक धुरळा आहे...; सुषमा अंधारे यांनी कोणत्या केंद्रीय मंत्र्याला टोला लगावला?
अरे बघ ही गर्दी, पाक धुरळा आहे...; सुषमा अंधारे यांनी कोणत्या केंद्रीय मंत्र्याला टोला लगावला? Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 17, 2022 | 10:57 AM
Share

कोल्हापूर: ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. नारायण राणे यांनी शिवसेना संपली असल्याचं म्हटलं होतं. शिवसेना संपली आहे. शिवसेनेत आहेत ते आमदारही आमच्याकडे येणार आहेत, असा दावा राणे यांनी केला होता. राणे यांच्या या दाव्याला सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अरे माझ्या सभेची ही गर्दी बघ.. पाक धुरळा उडाला आहे, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी राणेंवर हल्लाबोल केला आहे.

सुषमा अंधारे यांची कोल्हापुरात सभा होती. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. भाजपाकडून द्वेषमूलक राजकारणाची पेरणी केली जात आहे. भाजपच्या आयटी सेलमधून धर्म आणि जातीचं विष पेरलं जात आहे. लोकालोकांमध्ये भेद निर्माण जात आहे. हे उद्याच्या राजकारणासाठी घातक आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

शिंदे गटातील 40 मधील 20 आमदार हे उड्या मारण्यात माहीर आहेत. यातील अनेकांना उद्या भाजपमध्ये जाण्याशिवाय गत्यंतर नाही. तुम्ही आम्हाला ना ईडी लावू शकत, ना सीडी काढू शकता. फार फार तर वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करू शकता. गेल्या दोन दिवसांपासून तर ती सुरूच आहे, असं त्या म्हणाल्या.

दोन कोटी लोकांना रोजगार देऊ म्हणाला होतात, मिळाला का रोजगार? जी आश्वासनं तुम्ही दिली होती त्याबद्दल आम्ही विचारतोय. वेगळं काही करत नाही, असा टोला त्यांनी लगावला. सुषमा अंधारे किती महिन्यांपूर्वी शिवसेनेत आल्या हे महत्त्वाचं नाही. सुषमा अंधारे जे प्रश्न उपस्थित करत आहेत, त्याची उत्तरे द्या. ते प्रश्न महत्त्वाचे आहेत. आहेत का तुमच्याकडे उत्तर? असा सवालच त्यांनी केला.

मला दुसऱ्या पक्षातून आलेलं पार्सल म्हणता मग तुमच्याकडे आलेले कोण आहेत? तुमच्याकडे 50% राष्ट्रवादीचे, 25% काँग्रेसची आणि 15 टक्के आमचे भाऊ तुमच्याकडे आले आहेत. तुमचा भाजपवाल्यांचा आकडा आहे तरी किती? भाजपची अवस्था कशी झालीय माहीत आहे का? आपली लेकरं रस्त्यावर फिरतात आणि दुसऱ्याच्या लेकरांना येतोस का विचारत आहेत, अशी यांची अवस्था झाली आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.

आम्ही हिंदू आहोत हे तुम्हाला ओरडून सांगायची का गरज पडते? जे ओरिजनल असतं त्याला असं ओढून सांगायची गरज लागत नाही. दिलेली आश्वासन भाजपला पूर्ण करता येत नाहीत म्हणून विषय डायव्हर्ट करण्यासाठी चर्चा धर्मावर आणली जाते, असा दावाही त्यांनी केला.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.