AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम अभिनेत्रीचा शरद पवार गटात प्रवेश

'स्वराज्यरक्षक संभाजी' आणि 'आई कुठे काय करते' या मालिकांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री अश्विनी महांगडेनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश केला आहे. साताऱ्यात हा पक्षप्रवेश पार पडला.

'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम अभिनेत्रीचा शरद पवार गटात प्रवेश
Ashwini Mahangade Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 16, 2024 | 2:44 PM
Share

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ आणि ‘आई कुठे काय करते’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अश्विनी महांगडेनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे. अश्विनीला महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपद देण्यात आलं आहे. याची घोषणा या कार्यक्रमात करण्यात आली. साताऱ्यातील वाई इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या शिवस्वराज्य यात्रेच्या मेळाव्याला सुरुवात झाली. याच मेळाव्यात अश्विनीचा पक्षप्रवेश झाला. मेळाव्याला जयंत पाटील, अमोल कोल्हे, मेहबूब शेख, बाळासाहेब पाटील हेदेखील उपस्थित होते.

याआधी अश्विनीला काही प्रचारसभांमध्ये पाहिलं गेलं होतं. सातारा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी वाई इथं झालेली सभा अश्विनीने गाजवली होती. राष्ट्रवादीच्या मंचावर दिसल्याने तिला काहींच्या ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता. याविषयी एका मुलाखतीत अश्विनीने तिची बाजू स्पष्ट केली होती. “वाईपासून पाच किलोमीटर दूर असलेल्या पसरणी गावात माझा जन्म झाला. या गावात माझ्या वडिलांनी राजकारणात पिढ्या घडवल्या आहेत. त्यामुळे ते माझ्या रक्तातच आहे. मी कॉलेजमध्ये असल्यापासून या सगळ्यात सक्रीय आहे. माझ्या वडिलांनी शरद पवारांना नेतृत्त्व म्हणून खूप आधीच स्वीकारलं होतं. आमच्या घरात जेवतानाही पवार साहेबांच्या कामाची चर्चा व्हायची.” भविष्यात मला राजकारणात काही काम करण्याची आणि मोठी जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळाली तर मी नक्कीच त्याचा विचार करेन, असं अश्विनीने म्हणून दाखवलं होतं.

अश्विनीने नाटक आणि मालिकांमध्ये काम केलंय. ‘अस्मिता’ या मालिकेतून ती प्रकाशझोतात आली. तर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील भूमिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिने साकारलेल्या ‘राणू आक्का’च्या भूमिकेला प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळाली. अश्विनी ‘रयतेचं स्वराज्य प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थेअंतर्गतही अनेक सामाजिक कार्ये करत आहे. या संस्थेकडून कोरोना काळातही बरीच कामं झाली होती.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.