AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नितीश कुमारांना रोखण्यासाठीच भाजपकडून चिराग पासवानचा वापर- तारिक अन्वर

पाटना: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण चांगलंच तापलंय. अशातच आता काँग्रेस नेते तारिक अन्वर यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय. ‘बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए उरली नाही. जनता दल युनायटेड आणि लोक जनशक्ती पक्षातील वाद बिहारची जनता पाहते. यामागे भाजपचा हात आहे. भाजपनं चिराग पासवान यांचा वापर करत आहे’, असा […]

नितीश कुमारांना रोखण्यासाठीच भाजपकडून चिराग पासवानचा वापर- तारिक अन्वर
sagar joshi
sagar joshi | Updated on: Oct 13, 2020 | 7:03 PM
Share

पाटना: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण चांगलंच तापलंय. अशातच आता काँग्रेस नेते तारिक अन्वर यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय. ‘बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए उरली नाही. जनता दल युनायटेड आणि लोक जनशक्ती पक्षातील वाद बिहारची जनता पाहते. यामागे भाजपचा हात आहे. भाजपनं चिराग पासवान यांचा वापर करत आहे’, असा आरोप अन्वर यांनी केलाय. ( Tariq Anwars serious alligations against BJP)

बिहारच्या जनतेला सत्य परिस्थिती माहिती आहे. सत्ताधारी भाजप आणि जनता दल युनायटेड सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे आणि भाजपला ही वस्तूस्थिती मान्य आहे. त्यामुळेच नितीश कुमार यांच्याविरोधात वातावरण निर्मितीसाठी भाजपने चिराग पासवान यांना पुढे केल्याचा आरोप अन्वर यांनी केलाय.

बिहारमध्ये काँग्रेससाठी सकारात्मक वातावरण असल्याचा दावा तारिक अन्वर यांनी केलाय. राहुल गांधी हे बिहार निवडणूक प्रचारात उतरणार आहेत. त्याचबरोबर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्यासह अन्य काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्रीही बिहार निवडणूक प्रचारात उतरणार असल्याची माहिती अन्वर यांनी दिली आहे.

काँग्रेस पहिली यादी जाहीर, दुसरी आणि तिसरी कधी?

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी उद्या काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक आहे. या बैठकीत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असंही अन्वर यांनी म्हणाले.

पती-पत्नीच्या सरकारमुळं बिहार आजारी, आम्ही इलाज केला- नितीश कुमार

लालू प्रसाद यादव आणि राबडीदेवी या पती-पत्नीने 15 वर्ष बिहारवर राज्य केलं. त्यावेळी बिहारमध्ये कोणत्याही प्रकारची आरोग्य व्यवस्था नव्हती. बिहार आजारी होतं. मात्र आमच्या काळात आम्ही सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था उभारली. आम्ही इलाज काय असतो हे जनतेला दाखवून दिलं, अशी टीका बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलीय. बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारात नितीश कुमार यांनी सोमवारी व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी लालू यादव आणि राबडीदेवी यांच्यावर सडकून टीका केली

बिहार विधानसभा निवडणूक प्रचारात महाराष्ट्राचे चेहरे!

बिहार विधानसभा निवडणूक प्रचारासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचा समावेश आहे. भाजपकडून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बिहारच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर फडणवीस हे भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत. शिवसेना बिहारमध्ये आपले ५० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणार आहे. त्यांच्या प्रचार खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे करणार आहेत. तर राष्ट्रवादीनेही शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह काही महत्वाच्या नेत्यांची स्टार प्रचारक म्हणून नावं जाहीर केली आहेत.

संबंधित बातम्या:

पती-पत्नीच्या सरकारमुळे बिहार आजारी, आम्ही इलाज करुन दाखवला, नितीश कुमारांचा हल्लाबोल

Bihar Election : काँग्रेसकडून एकही मुस्लिम उमेदवार नाही, भाजप-जेडीयूचा हल्लाबोल

Tariq Anwars serious alligations against BJP

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत