‘मिर्चीची सवय लागली असेल तर सामान्यांच्या कराच्या पैशाची चहा गोड कशी लागणार?’, अतुल लोंढेंचा फडणवीसांचा टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यावर टेरर फंडिंगचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे मलिक यांच्या अडचणीही वाढताना दिसत आहेत. अशावेळी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही एका इंग्रजी वेबसाईटचा हवाला देत भाजपवर आरोप केलाय. तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला आहे.

'मिर्चीची सवय लागली असेल तर सामान्यांच्या कराच्या पैशाची चहा गोड कशी लागणार?', अतुल लोंढेंचा फडणवीसांचा टोला
अतुल लोंढे, देवेंद्र फडणवीसImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 5:05 PM

मुंबई : राज्यात सध्या सत्ताधारी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप नेत्यांमध्ये जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. सध्या टेरर फंडिंगचा (Terror Funding) मुद्दाही चांगलाच गाजतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर टेरर फंडिंगचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे मलिक यांच्या अडचणीही वाढताना दिसत आहेत. अशावेळी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनीही एका इंग्रजी वेबसाईटचा हवाला देत भाजपवर आरोप केलाय. तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला आहे.

‘प्रिय देवेंद्रजी, इक्बाल मिर्ची या मुंबई बाँब स्फोटातील अतिरेक्याशी संबंधित कंपन्यांकडून भाजपाला आलेल्या या डोनेशनबाबत आपण काही बोलणार आहात का? मिर्ची ची सवय लागली असेल तर सामान्य जनतेच्या कराच्या पैशाची चहा तुम्हाला गोड कशी लागेल?’ असा खोचक सवाल अतुल लोंढे यांनी फडणवीसांना विचारलाय.

नेमका प्रकार काय?

भारतीय जनता पार्टीने एका अशा कंपनीकडून मोठं डोनेशन घेतलं आहे, ज्या कंपनीची चौकशी सध्या अंमलबजावणी संचलनालयाकडून केली जातेय. या कंपनीशी दाऊद इब्राहिमचा सहकारी इक्बाल मेमन उर्फ इक्बाल मिर्चीचा संबंध होता असं वृत्त ‘द वायर’ने दिलं आहे. या वृत्ताचा धागा पकडत अतुल लोंढे यांनी भाजपला खोचक टोला लगवालाय.

फडणवीसांचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल

दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपची भूमिका आणि रोख स्पष्ट केला आहे. दाऊद इब्राहिम, अंडरवर्ल्डशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांना वाचवायला अख्खे सरकार उभे आहे. देशात असे कधी घडले नाही. ज्या सरकारचे प्रमुख शिवसेनेचे आहेत, ते मुंबईच्या खून्यांशी व्यवहार करणाऱ्या सोबत राहतात, हेही पाहतो आहोत. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होणारच. देशद्रोह्यांशी संबंध हा सर्वात मोठा गुन्हा आहे. त्यामुळे नवाब मलिक यांचा बचाव करताना नाही जनाची तर किमान मनाची तरी… नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नसतील, तर मग हेच म्हणावे लागेल की हे दाऊद इब्राहिमला समर्पित सरकार आहे. पण आम्हाला चर्चेत रस, अनेक मुद्दे मांडणार, चर्चा सुद्धा करणार, असं फडणवीस म्हणाले.

इतर बातम्या :

हे तर बेवड्यांना समर्पित सरकार, त्यांना शेतकरी नव्हे दारू उत्पादन करणारा जवळचा वाटतो- फडणवीसांचा घणाघात

कितीही गोंधळ घाला, नवाब मलिकांचा राजीनामा नाही म्हणजे नाहीच; जयंत पाटलांनी अधिवेशनापूर्वीच ठणकावले

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.