AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे पद आले धोक्यात, कोर्टात याचिका दाखल…

दिया कुमारी, प्रेमचंद बैरवा यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. मात्र, या दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील ओमप्रकाश सोलंकी यांनी ही याचिका दाखल केली आहे.

दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे पद आले धोक्यात, कोर्टात याचिका दाखल...
Rajasthan DCM Diya Kumari and Premchand Bairwa
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Dec 18, 2023 | 6:58 PM
Share

जयपूर | 18 डिसेंबर 2023 : राजस्थानमध्ये 200 विधानसभा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने 115 जागा जिंकून बहुमत प्राप्त केले. तर, काँग्रेसला केवळ 69 जागांवर समाधान मानावे लागले. राजस्थानमधील विजयानंतर भाजपने भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री म्हणून समोर आणले आहे. तर, दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांना उपमुख्यमंत्री केले. परंतु, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या शपथेवरून नवा वाद निर्माण झाला आहे. राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा यांनी शुक्रवारी जयपूरमधील अल्बर्ट हॉलसमोर आयोजित शपथविधी कार्यक्रमात भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री आणि दिया कुमारी, प्रेमचंद बैरवा यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. मात्र, याच शपथेवरून दोन्ही उपमुख्यमंत्री दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांच्याविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

राजघराण्यातील दिया कुमारी यांच्यासह डॉ. प्रेमचंद बैरवा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आदींनी दिया कुमारी यांना मिठाई खाऊ घालून त्यांचे अभिनंदन केले. त्यावेळी दिया कुमारी यांनी माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा आशीर्वाद घेतला होता.

दिया कुमारी यांनी शुक्रवारीच संध्याकाळी औपचारिक पूजेनंतर सचिवालय कार्यालयात पदभार स्वीकारला. दुसरे उपमुख्यमंत्री डॉ. प्रेमचंद बैरवा हे जयपूरच्या दुडू मतदारसंघातून विजयी झाले आहेत. अनुसूचित जातीचे ते प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांनी डॉक्टरेटची पदवी मिळवली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही उपमुख्यमंत्री पीएचडीधारक आहेत.

जयपूरचे वकील ओमप्रकाश सोलंकी यांनी याच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांविरोधात राजस्थान न्यायालयात जनहित याचिका दाखल केलीय. ‘घटनेनुसार उपमुख्यमंत्री यासारखे कोणतेही पद नाही आणि या दोन्ही नेत्यांनी या पदाची शपथ घेतली आहे, असा आक्षेप या याचिकेतून घेण्यात आला आहे.

वकील ओम प्रकाश सोलंकी यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, ‘राजस्थानचे दोन्ही उपमुख्यमंत्री, दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांच्याविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. घटनेत उपमुख्यमंत्र्यासारखे कोणतेही पद नाही. हे राजकीय पद आहे आणि ते घटनाबाह्य आहे असे ते म्हणाले.

Follow Us
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा
Uddhav Thackeray UNCUT | उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा; येत्या रविवारी...
अमित साटम की चाटम? साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
Sanjay Raut Press | अमित साटम की चाटम? मृत्यूंवर हसणं महागात पडणार; अमित साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? फडणवीस सरकारच्या मोठ्या हालचाली सुरू; आजच्या अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! वारकऱ्यांचा संताप अनावर
Indrayani River | पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! फेसाळलेल्या नदीने वारकऱ्यांचा संताप अनावर