AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रावर गंभीर संकट! हवामान विभागाचा धडकी भरवणारा अंदाज काय? दुष्काळ…

IMD Weather Update : हवामान विभागाच्या अंदाजाने संपूर्ण राज्याची चिंता वाढली आहे. सध्या हवामान प्रणाली सक्रिय नसल्याने महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता कमी झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

महाराष्ट्रावर गंभीर संकट! हवामान विभागाचा धडकी भरवणारा अंदाज काय? दुष्काळ...
IMD Drought Prediction newsImage Credit source: Google
| Updated on: Aug 18, 2026 | 4:08 PM
Share

राज्यातील काही जिल्हे वगळता बहुतांशी भागात पावसाचा तुटवडा पहायला मिळत आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. अशातच आता हवामान विभागाच्या अंदाजाने संपूर्ण राज्याची चिंता वाढली आहे. सध्या हवामान प्रणाली सक्रिय नसल्याने महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे आता आगामी काळात दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अनेक जिल्ह्यांमधील परिस्थिती चिंताजनक

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट महिन्यात पावसाची मोठी तूट असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ एस. डी. सानप यांनी दिली आहे. काही जिल्ह्यांमध्ये ही तूट 50 टक्क्यांपेक्षाही अधिक असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. जुलै महिन्यात काही प्रमाणात पावसाची तूट भरून निघाली होती. मात्र, ऑगस्टमध्ये परिस्थिती पुन्हा बदलली असून अनेक जिल्ह्यांमध्ये अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे पावसाच्या आकडेवारीत मोठी तफावत निर्माण झाली आहे.

मराठवाडा आणि विदर्भातील शेतीला फटका बसणार

ऑगस्ट महिन्यात नाशिक, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांचा अपवाद वगळता राज्यातील अनेक भागांत पावसाची स्थिती गंभीर असल्याचे हवामान तज्ज्ञ एस. डी. सानप यांनी सांगितले. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने या भागातील शेतीवर त्याचा थेट परिणाम होताना दिसत आहे. यामुळे थेट राज्याच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

संपूर्ण राज्यावर दुष्काळाचे सावट

काही भागांत पिकांना आवश्यक पाणी मिळत नसल्याचे शेतीची अवस्था वाईट आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास खरीप पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस पडेल, अशी अनुकूल हवामान परिस्थिती दिसत नसल्याचेही एस. डी. सानप यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता आगामी काळात राज्यातील काही जिल्ह्यांना दुष्काळाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

Follow Us
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात
अभिजीत दिपके यांच्या ठीक करो स्कूल अभियानाला गती
अभिजीत दीपकेंच्या स्कूल अभियानाला गती, मागण्या पूर्ण
बर्णे यांची सरकार, निवडणूक आयोगावर बौद्धिक नक्षलवादावरून टीका
बौद्धिक नक्षलवाद आणि निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर श्यामकुमार बर्णे यांची टीका
चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वात जालन्यात मुंडन आंदोलन
जालन्यात भीमशक्ती संघटनेचे मुंडन आंदोलन