AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrasekhar Bawankule : हे तर अडीच वर्षांतील सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री, यांनी केवळ वेळकाढूपणा केला, भाजप प्रदेशाध्यक्षांचा हल्लाबोल..

Chandrasekhar Bawankule : भाजप प्रदेशाध्यक्षांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे..

Chandrasekhar Bawankule : हे तर अडीच वर्षांतील सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री, यांनी केवळ वेळकाढूपणा केला, भाजप प्रदेशाध्यक्षांचा हल्लाबोल..
ठाकरेंवर हल्लाबोलImage Credit source: सोशल मीडिया
| Edited By: | Updated on: Nov 26, 2022 | 11:02 PM
Share

सिंधुदुर्ग : बुलढाण्यातून उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी आज पुन्हा रणशिंग फुंकले. राज्य सरकारवर सर्वच बाजूने त्यांनी बॉम्बगोळे फेकले. त्यामुळे विरोधाला पुन्हा धार चढली आहे. ठाकरेंच्या सभेनंतर त्यावर भाजप (BJP) आणि शिंदे गटातून (Shinde Group) प्रतिवाद करण्यात येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी ठाकरेंवर जोरदार पलटवार केला आहे. ठाकरे यांनी सरकारच्या कामगिरीवर बोट ठेवल्याने बावनकुळे यांनी जोरदार प्रहार केला. त्यांनी ठाकरे यांच्या सरकारच्या कारकिर्दीवर तिखट वाकबाण सोडले.

सिधुदुर्ग येथे माध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी ठाकरे सरकारच्या कारकिर्दीचा लेखाजोखा मांडला. ठाकरे सरकार अडीच वर्षातील सर्वात निष्क्रिय सरकार होते, त्यांनी केवळ वेळकाढूपणा केला असा आरोप त्यांनी केला.

ठाकरे यांचे सरकार सोशल मीडिया आणि रिमोट अॅक्सेसद्वारे सुरु असल्याचे तोंडसूख बावनकुळे यांनी घेतले. जनतेशी बोलताना फेसबूक लाईव्ह तर कॅबिनेटच्या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने ते हजर होते, त्यांच्या खासगी सचिवाला भेटायला चार चार दिवस वेळ देण्यात येत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

ठाकरे यांनी 18 महिने आमदारांची भेट घेतले नाही. त्यांच्या पत्रांवर स्वाक्षरी केली नाही. त्यांच्यात काहीच ताकद नव्हती. जी ताकद आहे ती पंतप्रधान मोदी यांच्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला.

आजच्या सभेत ठाकरे यांनी केलेली टीका, वापरलेल्या भाषेवरीही बावनकुळे यांना जोरदार प्रहार केला. जे आमदार, मंत्री, सहकारी निघून गेले, त्यांना रेडे म्हटल्या जात आहे. ठाकरे यांनी अशीच टीका केली तर पुढील निवडणुकीत त्यांचे दोन आमदारही निवडून येणार नाही, असा घणाघात त्यांनी केला.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.