AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जे कार्यालयात भेटत नव्हते ते आज गल्ली-बोळात फिरु लागलेत, केसरकरांच्या निशाण्यावर नेमके कोण?

ठाकरे कुटुंबियांबद्दल बोलायचे नाही असे ठरवले होते, पण आता खालच्या पातळीवरची टीका होत आहे. त्यामुळे कोणतेही आरोप पुढील काळात खपवून घेतले जाणार नाहीत.

जे कार्यालयात भेटत नव्हते ते आज गल्ली-बोळात फिरु लागलेत, केसरकरांच्या निशाण्यावर नेमके कोण?
दीपक केसरकरImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Sep 18, 2022 | 6:26 PM
Share

सिंधुदुर्ग : शिवसेनेतून बंड केले तरी (Thackeray Family) ठाकरे कुटुंबियांबद्दल विरोधात बोलायचे नाही, अशी भूमिका आमदारांनी घेतली होती. सुरवातीला ठाकरे कुटुंबिय आणि (Uddhav Thackeray) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणे टाळले गेले. पण जे शांत राहण्याचे आवाहन करीत होते तेच (Deepak Kesarkar) केसरकर आता ठाकरेंवर जहरी टीका करीत आहेत. आतापर्यंत मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील कार्यालयात भेटत नव्हते ते आता गल्ली-बोळात फिरु लागले असल्याचे केसरकर म्हणाले आहेत. राज्यात येणाऱ्या उद्योगांना यांच्याकडूनच विरोध होत असल्याचे सांगताना केसरकर यांनी ही टोकाची टीका केली आहे. उद्योगधंद्यामध्ये असेच राजकारण येत राहिले तर महाराष्ट्रात प्रकल्प घेऊन येताना संबंधित कंपनी 10 वेळेस विचार करेल असेही केसरकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे विकास कामामध्ये राजकारण नको अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

राज्याच्या विकासात उद्योग-व्यवसायांची मोठी भूमिका राहिलेली आहे. याच उद्योगातून बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार आहे. पण केवळ राजकीय स्वार्थ साधण्यासाठी अशा प्रकल्पांना विरोध करु नये असे आवाहन केसरकरांनी केले आहे. लोकांना भडकावून आपण सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करायचे हे कुठेतरी थांबले पाहिजे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

राज्यातील तरुण आता जागरुक झाला आहे. त्यांची माथी भडकावून आता काय साध्य होणार नाही. त्यांना बरोबर घेऊनच राज्य विकासाच्या वाटेवर घेऊन जायचे आहे. त्यामुळे विरोधकांनी कोणतिही खेळी केली तरी ती साध्य होणार नसल्याचे केसरकर म्हणाले आहेत.

अडीच वर्ष सत्ता असताना हे काही काम करु शकलेले नाहीत. आता केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असल्याने विकास कामे खेचून आणत येतात. तर यालाही विरोध दर्शवायचा, हे आता जनता खपवून घेणार नाही. त्यामुळे विकास कामात राजकारण आणू नये असा सल्ला केसरकरांनी विरोधकांना दिला आहे.

ठाकरे कुटुंबियांबद्दल बोलायचे नाही असे ठरवले होते, पण आता खालच्या पातळीवरची टीका होत आहे. त्यामुळे कोणतेही आरोप पुढील काळात खपवून घेतले जाणार नाहीत. जशाच तसे उत्तर दिले जाणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले आहे.

आता राजकारण सोडून राज्याच्या हितासाठी उद्योग-व्यवसायाच्या वेळी एकत्र येणे गरजेचे आहे. अन्यथा येथील राजकीय परस्थिती पाहून संबंधित कंपन्या ह्या 10 वेळेस विचार करुन परत जातील. त्यामुळे विकासकामात राजकारण करु नका अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.