AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ममता बॅनर्जींचे 3 आमदार दिल्लीला रवाना, भाजप प्रवेशाची शक्यता

कोलकाता : लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर भाजप आता टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांना विधानसभेतही धक्का देण्याची शक्यता आहे. ‘टाइम्स नाऊ’च्या वृत्तानुसार टीएमसीचे तीन आमदार भाजपात दाखल होण्याची शक्यता आहे. हे तीन आमदार दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. बंगालमध्ये लोकसभेला भाजपने पहिल्यांदाच 42 पैकी 18 जागांवर विजय मिळवलाय. 2014 च्या निवडणुकीत भाजपने फक्त दोन […]

ममता बॅनर्जींचे 3 आमदार दिल्लीला रवाना, भाजप प्रवेशाची शक्यता
| Edited By: | Updated on: May 27, 2019 | 10:40 PM
Share

कोलकाता : लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर भाजप आता टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांना विधानसभेतही धक्का देण्याची शक्यता आहे. ‘टाइम्स नाऊ’च्या वृत्तानुसार टीएमसीचे तीन आमदार भाजपात दाखल होण्याची शक्यता आहे. हे तीन आमदार दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. बंगालमध्ये लोकसभेला भाजपने पहिल्यांदाच 42 पैकी 18 जागांवर विजय मिळवलाय.

2014 च्या निवडणुकीत भाजपने फक्त दोन जागा जिंकल्या होत्या, तर यावेळी मोठी उडी घेत 18 जागांवर विजय मिळवला. टीएमसीचे 40 आमदार आमच्या संपर्कात असल्यादा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारात केला होता. विशेष म्हणजे बंगालमधील भाजप आमदारानेही हाच दावा करत पुढच्या 90 दिवसांमध्ये ममतांचं सरकार पडणार असल्याचं सांगितलं होतं.

एकाच विमानाने टीएमसीचे तीन आमदार दिल्लीला रवाना झाल्याने टीएमसीच्या गोटात खळबळ आहे. भाजप नेते मुकुल रॉय यांचा मुलगा आमदार सुभ्रांशू रॉय यांचाही या तीन आमदारांमध्ये समावेश आहे. सुभ्रांशू रॉय यांना काही दिवसांपूर्वीच पक्षातून निलंबित करण्यात आलंय. पक्षविरोधी काम केल्याचा ठपका रॉय यांच्यावर ठेवण्यात आलाय.

एकेकाळचे ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय असणारे मुकुल रॉय यांनी लोकसभेच्या अगोदर भाजपात प्रवेश केला होता. वडिलांचं कौतुक केल्यामुळे सुभ्रांशू यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं. बंगालमधील भाजपच्या दमदार कामगिरीचं श्रेय सुभ्रांशू यांनी वडिलांना दिलं होतं. भाजपचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष यांच्या दाव्यानुसार, टीएमसीचे जवळपास 100 नेते भाजपच्या संपर्कात आहेत.

295 सदस्यसंख्या असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभेत टीएमसीचे 213 आमदार आहेत. सीपीआयएम 25, आरएसपी 03, एआयएफबी 02, सीपीआय 01, भाजप 06 आणि इतर 02 असं संख्याबळ आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या सरकारला सध्या तरी कोणताही धोका दिसत नाही. पण लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने हिंसाचार झाला, त्यानंतर भाजप आणि टीएमसी यांच्यात जुंपली आहे.

Follow Us
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.