AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ममता बॅनर्जींचे 3 आमदार दिल्लीला रवाना, भाजप प्रवेशाची शक्यता

कोलकाता : लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर भाजप आता टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांना विधानसभेतही धक्का देण्याची शक्यता आहे. ‘टाइम्स नाऊ’च्या वृत्तानुसार टीएमसीचे तीन आमदार भाजपात दाखल होण्याची शक्यता आहे. हे तीन आमदार दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. बंगालमध्ये लोकसभेला भाजपने पहिल्यांदाच 42 पैकी 18 जागांवर विजय मिळवलाय. 2014 च्या निवडणुकीत भाजपने फक्त दोन […]

ममता बॅनर्जींचे 3 आमदार दिल्लीला रवाना, भाजप प्रवेशाची शक्यता
| Edited By: | Updated on: May 27, 2019 | 10:40 PM
Share

कोलकाता : लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर भाजप आता टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांना विधानसभेतही धक्का देण्याची शक्यता आहे. ‘टाइम्स नाऊ’च्या वृत्तानुसार टीएमसीचे तीन आमदार भाजपात दाखल होण्याची शक्यता आहे. हे तीन आमदार दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. बंगालमध्ये लोकसभेला भाजपने पहिल्यांदाच 42 पैकी 18 जागांवर विजय मिळवलाय.

2014 च्या निवडणुकीत भाजपने फक्त दोन जागा जिंकल्या होत्या, तर यावेळी मोठी उडी घेत 18 जागांवर विजय मिळवला. टीएमसीचे 40 आमदार आमच्या संपर्कात असल्यादा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारात केला होता. विशेष म्हणजे बंगालमधील भाजप आमदारानेही हाच दावा करत पुढच्या 90 दिवसांमध्ये ममतांचं सरकार पडणार असल्याचं सांगितलं होतं.

एकाच विमानाने टीएमसीचे तीन आमदार दिल्लीला रवाना झाल्याने टीएमसीच्या गोटात खळबळ आहे. भाजप नेते मुकुल रॉय यांचा मुलगा आमदार सुभ्रांशू रॉय यांचाही या तीन आमदारांमध्ये समावेश आहे. सुभ्रांशू रॉय यांना काही दिवसांपूर्वीच पक्षातून निलंबित करण्यात आलंय. पक्षविरोधी काम केल्याचा ठपका रॉय यांच्यावर ठेवण्यात आलाय.

एकेकाळचे ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय असणारे मुकुल रॉय यांनी लोकसभेच्या अगोदर भाजपात प्रवेश केला होता. वडिलांचं कौतुक केल्यामुळे सुभ्रांशू यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं. बंगालमधील भाजपच्या दमदार कामगिरीचं श्रेय सुभ्रांशू यांनी वडिलांना दिलं होतं. भाजपचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष यांच्या दाव्यानुसार, टीएमसीचे जवळपास 100 नेते भाजपच्या संपर्कात आहेत.

295 सदस्यसंख्या असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभेत टीएमसीचे 213 आमदार आहेत. सीपीआयएम 25, आरएसपी 03, एआयएफबी 02, सीपीआय 01, भाजप 06 आणि इतर 02 असं संख्याबळ आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या सरकारला सध्या तरी कोणताही धोका दिसत नाही. पण लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने हिंसाचार झाला, त्यानंतर भाजप आणि टीएमसी यांच्यात जुंपली आहे.

Follow Us
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.