AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ममता बॅनर्जींचे 3 आमदार दिल्लीला रवाना, भाजप प्रवेशाची शक्यता

कोलकाता : लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर भाजप आता टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांना विधानसभेतही धक्का देण्याची शक्यता आहे. ‘टाइम्स नाऊ’च्या वृत्तानुसार टीएमसीचे तीन आमदार भाजपात दाखल होण्याची शक्यता आहे. हे तीन आमदार दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. बंगालमध्ये लोकसभेला भाजपने पहिल्यांदाच 42 पैकी 18 जागांवर विजय मिळवलाय. 2014 च्या निवडणुकीत भाजपने फक्त दोन […]

ममता बॅनर्जींचे 3 आमदार दिल्लीला रवाना, भाजप प्रवेशाची शक्यता
| Edited By: | Updated on: May 27, 2019 | 10:40 PM
Share

कोलकाता : लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर भाजप आता टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांना विधानसभेतही धक्का देण्याची शक्यता आहे. ‘टाइम्स नाऊ’च्या वृत्तानुसार टीएमसीचे तीन आमदार भाजपात दाखल होण्याची शक्यता आहे. हे तीन आमदार दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. बंगालमध्ये लोकसभेला भाजपने पहिल्यांदाच 42 पैकी 18 जागांवर विजय मिळवलाय.

2014 च्या निवडणुकीत भाजपने फक्त दोन जागा जिंकल्या होत्या, तर यावेळी मोठी उडी घेत 18 जागांवर विजय मिळवला. टीएमसीचे 40 आमदार आमच्या संपर्कात असल्यादा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारात केला होता. विशेष म्हणजे बंगालमधील भाजप आमदारानेही हाच दावा करत पुढच्या 90 दिवसांमध्ये ममतांचं सरकार पडणार असल्याचं सांगितलं होतं.

एकाच विमानाने टीएमसीचे तीन आमदार दिल्लीला रवाना झाल्याने टीएमसीच्या गोटात खळबळ आहे. भाजप नेते मुकुल रॉय यांचा मुलगा आमदार सुभ्रांशू रॉय यांचाही या तीन आमदारांमध्ये समावेश आहे. सुभ्रांशू रॉय यांना काही दिवसांपूर्वीच पक्षातून निलंबित करण्यात आलंय. पक्षविरोधी काम केल्याचा ठपका रॉय यांच्यावर ठेवण्यात आलाय.

एकेकाळचे ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय असणारे मुकुल रॉय यांनी लोकसभेच्या अगोदर भाजपात प्रवेश केला होता. वडिलांचं कौतुक केल्यामुळे सुभ्रांशू यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं. बंगालमधील भाजपच्या दमदार कामगिरीचं श्रेय सुभ्रांशू यांनी वडिलांना दिलं होतं. भाजपचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष यांच्या दाव्यानुसार, टीएमसीचे जवळपास 100 नेते भाजपच्या संपर्कात आहेत.

295 सदस्यसंख्या असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभेत टीएमसीचे 213 आमदार आहेत. सीपीआयएम 25, आरएसपी 03, एआयएफबी 02, सीपीआय 01, भाजप 06 आणि इतर 02 असं संख्याबळ आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या सरकारला सध्या तरी कोणताही धोका दिसत नाही. पण लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने हिंसाचार झाला, त्यानंतर भाजप आणि टीएमसी यांच्यात जुंपली आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.