AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election : ठाकरे गटाकडून स्वबळाची घोषणा होताच शिवसेना शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया

BMC Election : संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना ठाकरे गट मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व पालिका निवडणुका स्वबळावर लढवणार अशी घोषणा केली. लगेच या वक्तव्याचे पडसाद उमटण्यास सुरुवाच झाली. आता शिवसेना शिंदे गटाकडून यावर प्रतिक्रिया आली आहे.

BMC Election : ठाकरे गटाकडून स्वबळाची घोषणा होताच शिवसेना शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया
Uday Samant
| Updated on: Jan 11, 2025 | 12:01 PM
Share

उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना एक मोठी घोषणा केली. राजकीय वर्तुळात लगेच त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व पालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची खासदार संजय राऊत यांनी घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढवण्याचे संकेत दिल्याच संजय राऊत म्हणाले. ठाकरे गटाकडून ही घोषणा झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया आली आहे. “त्यांच्यामध्ये काय चाललं आहे, हे जसं तुम्हाला कळत नाही, तसं महाराष्ट्राच्या मतदाराला सुद्धा कळत नाही” असं मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत म्हणाले.

“2019 ला जनमताचा कौल मिळालेला असताना काँग्रेससोबत जाणं. त्यानंतर काँग्रेसच्या हाताच प्रचार करणं. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं, भविष्यात शिवसेनेकडून हाताचा प्रचार कधीही होऊ शकत नाही. त्या काँग्रेसचा प्रचार केला. भाषणात हिंदूह्दय सम्राट शब्द न वापरणं, याचे सगळ्याचे फटके बसले असतील. म्हणून कदाचित हा निर्णय घेतला असेल” असं उदय सामंत म्हणाले.

….तर ते राजकरणात टिकणार कसे?

ठाकरे गट योग्य वळणावर येतोय का? या प्रश्नावर उदय सामंत म्हणाले की, “योग्य वळणावर येतोय का, हे त्यांनाच माहित. काही गोष्टींची त्यांना जाणीव झाली असेल. म्हणून महाविकास आघाडीतून बाहेर पडत असतील” अपेक्षित यश मिळेल का? ’15 वर्ष तरी आम्हाला चिंता करण्याची गरज नाही’ असं उत्तर उदय सामंत यांनी दिलं. “पक्ष टिकवायचा असेल, कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवायचा असेल, तर त्यांना नावीन्यपूर्ण प्रयोग करावे लागतील. त्यालाच त्यांचं प्राधान्य असेल. हे प्रयोग केले नाहीत, तर ते राजकरणात टिकणार कसे?” असं उदय सामंत म्हणाले

त्यांच्यामध्ये असुरक्षितता

बाळासाहेबांचे विचार सोडले नाहीत, ते परत येऊ शकतात असं ठाकरे बोलले आहेत. त्यावर उदय सामंत म्हणाले की, “ते तुम्ही असं कुठे म्हणाले. काल परवाची त्यांची भूमिका आणि आजची भूमिका यातून दिसतय प्रचंड असुरक्षितता त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलय, सर्वसामान्यांचा नेता जनतेमध्ये गेला, तर यश मिळवू शकतो”

Follow Us
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा फटका; तब्बल 18...
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा