AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज आणि उद्धव ठाकरेंबाबत जगदगुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांची मोठी भविष्यवाणी; काय घडणार राजकारणात?

मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येण्याची घोषणी केली आहे. दोन्ही पक्षांच्या युतीवर जगदगुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी भाष्य केले आहे.

राज आणि उद्धव ठाकरेंबाबत जगदगुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांची मोठी भविष्यवाणी; काय घडणार राजकारणात?
Raj and Uddhav Thackeray
| Updated on: Jul 08, 2025 | 4:16 PM
Share

मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येण्याची घोषणी केली आहे. दोन्ही पक्षांचा 5 जुलै रोजी एकत्र विजयी मेळावाही पार पडला. तसेच सेना मनसेने एकत्र अनेक आंदोलनेही केली आहेत. हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे आगामी निवडणूकीत दोन्ही पक्षांना फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. अशातच आता दोन्ही पक्षांच्या युतीवर जगदगुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी भाष्य केले आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा हा मेळ अमेळ आहे

जगदगुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी म्हटले की, ‘महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि येथे अनेक विद्वान झाले आहेत, ज्यांनी खूप चांगल्या शिकवणी देऊन स्वतःला देवाला समर्पित केले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा हा मेळ अमेळ आहे. तो जास्त काळ टिकणार नाही. तसेच त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नाही.’

हिंमत असेल तर त्यांनी बॉलीवूडला हिंदी चित्रपट बनवण्यापासून थांबवावे

पुढे बोलताना सरस्वती महाराज म्हणाले की, ‘आपण हिंदी भाषा कशी थांबवू शकतो? आज मुंबईत बॉलीवूड आहे आणि महाराष्ट्रातील लोक बॉलीवूडच्या कमाईवर जगतात. जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी बॉलिवूडला चित्रपट बनवण्यापासून थांबवावे आणि मराठी चित्रपट बनवायला सुरुवात करावी. ते हिंदूंवर नाही तर भारतीयांवर हल्ला करत आहेत, जर त्यांना ते करायचे असेल तर त्यांनी दुसऱ्या राज्यात जाऊन ते करावे .

युती जास्त काळ टिकणार नाही

राज ठाकरेंच्या हिंदी मराठी मुद्द्यावर शंकराचार्य म्हणाले की, ‘त्यांनी हा मुद्दा आधीही उपस्थित केला होता पण तो भरती-ओहोटीसारखा आला आणि गेला. मी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्र येण्याचे स्वागत करतो, पण ही युती जास्त काळ टिकणार नाही.’

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.