AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तुझ्या काय बापाचं जातंय’, उद्धव ठाकरे प्रचंड संतापले, नेमका रोख कुणाकडे?

उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या मेळाव्यात जोरदार भाषण केले. आपल्या या भाषणात त्यांनी भाजपावर सडकून टीका केली. त्यांनी राज्य सरकारच्या महिलाविषयक, शेतकरीविषयक धोरणावर बोट ठेवलं.

'तुझ्या काय बापाचं जातंय', उद्धव ठाकरे प्रचंड संतापले, नेमका रोख कुणाकडे?
uddhav thackeray
| Updated on: Apr 16, 2025 | 6:35 PM
Share

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या मेळाव्यात जोरदार भाषण केले. आपल्या या भाषणात त्यांनी भाजपावर सडकून टीका केली. त्यांनी राज्य सरकारच्या महिलाविषयक, शेतकरीविषयक धोरणावर बोट ठेवलं. तसेच महायुतीने निवडणुकीवेळी भरपूर आश्वासनं दिली, पण त्या आश्वासनांचं काय झालं? असा सवाल केला. सोबतच त्यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या विधानाचाही समाचार केला. शेतकऱ्यांनी कर्ज काढलं, तुझ्या बापाचं काय चाललंय? असा थेट हल्लाबोल ठाकरेंनी केला.

त्यांनी दणादण घोषणा जाहीर केल्या, पण….

भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात काही वचनं दिली होती. थापा मारल्या होत्या. शेतकऱ्यांचे आम्ही कर्ज माफ करू, माताभगिनींना आम्ही 2100 रुपये देऊ असे सांगितले होते. किती रुपये महिलांच्या खात्यावर आले. त्यांनी दणादण घोषणा जाहीर केल्या. पण आता सांगत आहेत, फक्त 500 रुपयेच मिळतील. मग माताभगिनींना फसवून का मते घेतलीत? असा रोखठोक सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

कोकाटे अगोदर बोंबलत होते की….

पुढे बोलताना त्यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या विधानाचीही समाचार घेतला. ” माझ्या शेतकऱ्यांनाही त्यांनी फसवले. कोकाटे अगोदर बोंबलत होते की 31 मार्चपर्यंत मनो किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जातील. पण पैसे आले का? आज तारीख 16 एप्रिल तारीख आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले का?” असा हल्लाबोल ठाकरेंनी केला.

त्यांच्या बापाचे काय जात आहे?

“शेतकऱ्यांची चेष्ठा चालू आहे. कोकाटे म्हणाले कर्जमाफी कशाला पाहिजे, लग्न कराला का? पण त्यांच्या बापाचे काय जात आहे. आम्ही कर्ज काढतोय, शेती करतोय. तुम्हाला काय करायचे आहे,” असो थेट सवाल ठाकरेंनी केला. तसेच शेतकरी आत्महत्या करतो, त्या घरात कधी मंत्री जातो का? असा प्रश्नही ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

मी मेलो तरी हिंदुत्त्व सोडणार नाही

पुढे बोलताना ठाकरेंनी हिंदुत्त्वावरही भाष्य केलं. “आम्ही जे करायचं ते उघडपणे करतो. आमच्या मनात कधी पाप नसतं. आमचं हिंदुत्त्व एवढं तकलादू नाही. एखादी गोष्ट केली आणि एखादी गोष्ट केली नाही म्हणून आम्ही भष्ट झालो. कुणाची सावली पडली म्हणून आम्ही बाटलो, असं थोतांड हिंदुत्त्व आमचं नाही,” असं ठाकरेंनी ठणकावून सांगितलं. तसेच मी भाजपाला सोडलं. मी हिंदुत्त्व सोडलं नाही. मी मेलो तरी हिंदुत्त्व सोडणार नाही, असंही ठाकरेंनी स्पष्ट केलं.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.