AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना फोडण्याआधी इतिहास जाणून घ्या; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर जबरदस्त पलटवार

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प ( Vedanta-Foxconn Joint Venture) प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास तत्कालीन महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप शिंदे-फडणवीस सरकारकडून केला जात आहे.

शिवसेना फोडण्याआधी इतिहास जाणून घ्या; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर जबरदस्त पलटवार
| Updated on: Sep 17, 2022 | 4:42 PM
Share

मुंबई : वेदांता प्रोजेक्ट गुजरातला जाण्यास तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच(Uddhav Thackeray) जबाबदार असल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर(Deepak Kesarkar )यांनी केला होता. वेदांचा प्रकल्पावरून उद्धव ठाकरे यांनी ही पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना फोडण्याआधी इतिहास जाणून घ्या असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्रातील 1.54 लाख कोटींचा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प ( Vedanta-Foxconn Joint Venture)गुजरातला गेल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच पेटले आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास तत्कालीन महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप शिंदे-फडणवीस सरकारकडून केला जात आहे.

शिंदे गटातील नेत्यांकडून शिवसेनेवर गंभीर आरोप केले जात आहेत. विशेषत: शिंदे गटातील नेते थेट शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना टार्गेट करत आहेत. त्यांच्या या आरोपांना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरें यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

वेदांता प्रकल्प राज्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. शिवसेना फोडायचा काही जण प्रयत्न करीत आहेत. शिवसेना फोडण्या आधी इतिहास जाणून घ्यावा असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे. शिवसेनेची सहावी पिढी मैदानात उतरलेली आहे असंही उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.

माझ्या समोर बसलेला हा शिवसैनिक धगधगत्या मशालीसारखाआता मैदानात उतरला आहे. फॉक्सकॉन प्रकल्प आणण्यासाठी आपल्या सरकारने खूप प्रयत्न केले. पण आता तो गेल्यानंतर आताचं सरकार त्या अपयशाचे खापर जाणीवपूर्वक आपल्यावर फोडत आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

काय म्हणाले होते केसरकर?

दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत. मी स्वतः उद्धव ठाकरे यांना पत्र दिलं, भेटून विनंती केली होती. या प्रोजेक्ट साठी,उद्योगसमूह चेअरमन अनिल अग्रवाल यांना उद्धव ठाकरे यांची भेट हवी होती. मात्र,उद्धव ठाकरे यांनी त्यांना वेळही दिला नाही असा आरोप दीपक केसरकर यांनी केला.

कोणत्याही उद्योगपतीची पहिली पसंती महाराष्ट्र असते मात्र गेल्या सरकारच्या अस्थिर राजकारणानं, हा उद्योग महाराष्ट्राबाहेर गेला. मराठी माणसांच्या नोकऱ्या जाण्यास यांचा नाकर्तेपणा कारणीभूत असल्याचे केसरकर म्हणाले होते.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.