AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना फोडण्याआधी इतिहास जाणून घ्या; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर जबरदस्त पलटवार

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प ( Vedanta-Foxconn Joint Venture) प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास तत्कालीन महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप शिंदे-फडणवीस सरकारकडून केला जात आहे.

शिवसेना फोडण्याआधी इतिहास जाणून घ्या; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर जबरदस्त पलटवार
| Updated on: Sep 17, 2022 | 4:42 PM
Share

मुंबई : वेदांता प्रोजेक्ट गुजरातला जाण्यास तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच(Uddhav Thackeray) जबाबदार असल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर(Deepak Kesarkar )यांनी केला होता. वेदांचा प्रकल्पावरून उद्धव ठाकरे यांनी ही पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना फोडण्याआधी इतिहास जाणून घ्या असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्रातील 1.54 लाख कोटींचा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प ( Vedanta-Foxconn Joint Venture)गुजरातला गेल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच पेटले आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास तत्कालीन महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप शिंदे-फडणवीस सरकारकडून केला जात आहे.

शिंदे गटातील नेत्यांकडून शिवसेनेवर गंभीर आरोप केले जात आहेत. विशेषत: शिंदे गटातील नेते थेट शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना टार्गेट करत आहेत. त्यांच्या या आरोपांना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरें यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

वेदांता प्रकल्प राज्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. शिवसेना फोडायचा काही जण प्रयत्न करीत आहेत. शिवसेना फोडण्या आधी इतिहास जाणून घ्यावा असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे. शिवसेनेची सहावी पिढी मैदानात उतरलेली आहे असंही उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.

माझ्या समोर बसलेला हा शिवसैनिक धगधगत्या मशालीसारखाआता मैदानात उतरला आहे. फॉक्सकॉन प्रकल्प आणण्यासाठी आपल्या सरकारने खूप प्रयत्न केले. पण आता तो गेल्यानंतर आताचं सरकार त्या अपयशाचे खापर जाणीवपूर्वक आपल्यावर फोडत आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

काय म्हणाले होते केसरकर?

दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत. मी स्वतः उद्धव ठाकरे यांना पत्र दिलं, भेटून विनंती केली होती. या प्रोजेक्ट साठी,उद्योगसमूह चेअरमन अनिल अग्रवाल यांना उद्धव ठाकरे यांची भेट हवी होती. मात्र,उद्धव ठाकरे यांनी त्यांना वेळही दिला नाही असा आरोप दीपक केसरकर यांनी केला.

कोणत्याही उद्योगपतीची पहिली पसंती महाराष्ट्र असते मात्र गेल्या सरकारच्या अस्थिर राजकारणानं, हा उद्योग महाराष्ट्राबाहेर गेला. मराठी माणसांच्या नोकऱ्या जाण्यास यांचा नाकर्तेपणा कारणीभूत असल्याचे केसरकर म्हणाले होते.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.