Uddhav Thackeray: GenZ शी बोलण्याआधी भागवतांनी अमित शाहांचा राजीनामा घ्यायला हवा होता; उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी नुकताच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी 'GenZ शी बोलण्याआधी भागवतांनी अमित शाहांचा राजीनामा घ्यायला हवा होता' असे म्हटले आहे.

सध्या राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाने तर देशात खळबळ माजली. भाजप आणि देशातील जेन झी, जेन अल्फा पिढीतील विसंवाद जंतरमंतरवरील CJP आंदोलावरून समोर आला. त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी तरुणाईशी संवाद साधला. आता शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत ‘GenZ शी बोलण्याआधी भागवतांनी अमित शाहांचा राजीनामा घ्यायला हवा होता’ असे म्हणत खोचक टोला लागवला आहे.
“भागवतांनी अमित शाहांचा राजीनामा घ्यायला हवा होता”
माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, देशात सर्व लोक बोलायला लागले आहे. मोदी सरकार विरोधात बोलत आहे. फसवणुकीचे दिवस गेले. अच्छे दिन वाट बघता बघता वाईट दिवस येत आहे. यासाठी सरकारने पाठिंबा दिला नव्हता. मोहन भागवत यांनी तरुणांशी संवाद साधण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण तरुण म्हणत होते हे आता काय करता? तुमचं सरकार असं वागत असताना तुम्ही का गप्प बसला? आताही अमित शाह यांचा राजीनामा मागितला जात आहे. संघाचं सरकार ऐकत असेल तर भागवत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यापूर्वी अमित शाह यांचा राजीनामा घेतला पाहिजे.
पक्ष आणि चिन्हाबाबत काय म्हणाले?
पुढे ते शिवसेना पक्ष आणि चिन्हाविषयी बोलताना म्हणाले की, आम्ही चार वर्षापासून निकालाची वाट पाहत आहोत. आता निकाल लागेल असं वाटतं. आता प्रश्नोत्तरे सुरू आहे. निवडणूक आयोगाने आमची घटना त्यांच्याकडे नाही असं म्हटलं. नसेल तर आमच्याकडे मागायला हवी होती. घटना नाही म्हणून निकाल नाही बदलू शकत. आता कोर्टात सुनावणी सुरू आहे. आम्ही आशादायी आहोत. कुणावर अन्याय निकाल नको. संविधानानुसार निकाल हवा. देशात सर्व लोक बोलायला लागले आहे. मोदी सरकार विरोधात बोलत आहे. फसवणुकीचे दिवस गेले. अच्छे दिन वाट बघता बघता वाईट दिवस येत आहे. यासाठी सरकारने पाठिंबा दिला नव्हता. आम्ही कोर्टात मुद्दा मांडणार आहोत. जनतेच्या न्यायालयात पहिल्यांदा मांडतोय. कुणाच्या पाठिशी हा भाग वेगळा. पण गद्दारांना पंतप्रधान भेटतात आणि पाठिशी उभं राहण्याचं आश्वासन देतात हे निंदणीय आहे.
ही लढाई शिवसेनेपुरती नाही. गद्दारीचा हा व्हायरस देशभर पसरत आहे. मोदींनी इतर पक्षातील गद्दारांनाही हा संदेश दिला का. आमच्याकडे या.. तुमच्या केसालाही हात लागणार नाही. मी तुमच्यापाठी आहे. मोदींची धमकी कुणाला. शाह, फडणवीस की कोर्टाला. याचा खुलासा झाला पाहिजे. हा गद्दारीचा व्हायरस देशभर पसरत आहे. मी सर्वांना आवाहन करतो आपण लोकशाहीसाठी लढलं पाहिजे. देशातील तरुणाचं माथं भडकलं आहे. यांनी कितीही प्रयत्न केला तर तरुण ऐकायला तयार नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले.
