AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…म्हणून थरुर हेच राष्ट्रीय अध्यक्ष व्हावेत, काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य

आज काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाचा दिवस आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आज मतदान होत आहे.

...म्हणून थरुर हेच राष्ट्रीय अध्यक्ष व्हावेत, काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य
| Updated on: Oct 17, 2022 | 12:14 PM
Share

मुंबई : आज काँग्रेस (Congress) पक्षासाठी महत्त्वाचा दिवस आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीवर चर्चा सुरू होती. काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असणार?, काँग्रेसचा नवा अध्यक्ष हा गांधी घराण्याबाहेरील असणार की पुन्हा एकदा गांधी घराण्यातीलच कोणीतरी अध्यक्ष होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता जवळपास चित्र स्पष्ट झालं आहे. तब्बल 37 वर्षानंतर काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरील राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे. आज काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक होत असून, त्यासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. शशी थरुर (Shashi Tharoor) आणि मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) हे काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आता लवकरच काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण होणार हे स्पष्ट होणार आहे.

 ‘थरुर यांना वाढता पाठिंबा’

या निवडणुकीचा निकाल 19  ऑक्टोबरला लागणार आहे. या निवडणुकीबाबत काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी मोठं वस्तव्य केलं आहे. महाराष्ट्रातून  शशी थरुर यांना सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होईल असं देशमुख यांनी म्हटलं आहे. निवडणुकीबाबत बोलताना देशमुख यांनी म्हटलं की, ही निवडणूक काँग्रेससाठी अतिशय महत्त्वाची आहे. मल्लिकार्जून खरगे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, ते महाराष्ट्राचे प्रभारी आहेत. याबद्दल वादच नाही. मात्र आम्ही ज्या पद्धतीने शशी थरुर यांचा प्रचार करत आहोत, थरुर हे महाराष्ट्रात देखील आले होते. यावरून आम्हाला खात्री आहे की त्यांना राज्यातून सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होईल.

थरुर यांना काँग्रेसमधून मोठ्याप्रमाणात पाठिंबा मिळत आहेत. गेले अनेक वर्ष काँग्रेसची महाराष्ट्रात सत्ता होती. मात्र आज काँग्रेस महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकांचा पक्ष झाला आहे. या सर्व परिस्थितीतून थरुर हेच काँग्रेसला बाहेर काढू शकतील असा विश्वास काँग्रेसच्या सदस्यांना वाटत असल्याचं देशमुख यांनी म्हटलं आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.