AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्ही शिवसेनेबरोबर कधीही जाणार नाही : अजित पवार

रायगड : शिवसेना आणि आमचे विचार भिन्न आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत राष्ट्रवादी कधीच जाणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलंय. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटल्यानंतर याबाबत चर्चा सुरु झाली होती. यावर बोलताना ते म्हणाले की, जितेंद्र आव्हाड हे उद्धव ठाकरेंना पुस्तक देण्यासाठी गेले होते. राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेला […]

आम्ही शिवसेनेबरोबर कधीही जाणार नाही : अजित पवार
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM
Share

रायगड : शिवसेना आणि आमचे विचार भिन्न आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत राष्ट्रवादी कधीच जाणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलंय. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटल्यानंतर याबाबत चर्चा सुरु झाली होती. यावर बोलताना ते म्हणाले की, जितेंद्र आव्हाड हे उद्धव ठाकरेंना पुस्तक देण्यासाठी गेले होते.

राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेला आजपासून सुरुवात झाली. या माध्यमातून राज्य पिंजून काढलं जाणार आहे. भाजप सरकारने भ्रमनिरास केला असून  बेरोजगारी, महागाईसह अनेक समस्यांनी राज्याला ग्रासलंय. त्यामुळे परिवर्तन करण्याची गरज असल्याचं अजित पवार म्हणाले.

राज्यात 25 फेब्रुवारीपर्यंत निर्धार परिवर्तन संपर्क यात्रा काढली जाणार आहे.  राज्यात किमान 75 सभा घेतल्या जातील. रोज तीन सभा घेऊन दुष्काळ, ग्रामीण शहरी समस्या, आरक्षण, हमीभाव, फसवी आश्वासने, कर्जमाफीवर आवाज उठवणार असल्याचा ईशारा अजित पवारांनी दिलाय. आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्णांच्या आरक्षणाचा चुनावी जुमला असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप सरकार समाजात तेढ निर्माण करत असल्याची टीका त्यांनी केली.

आघाडीवरही अजित पवारांनी भाष्य केलं. 40 जागांवर जागा वाटप झालं असून  आठ जागांवर बोलणी सुरु आहे. आघाडी संदर्भात वरिष्ठ नेते शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यात चर्चा झाली असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं. सेक्युलर मतं एकत्र ठेवून भाजपचा पराभव करणार असल्याचा दावा त्यांनी केलाय.

छगन भुजबळांची मोदींवर टीका

राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेत मुलूख मैदानी तोफ छगन भुजबळ हे एक स्टार प्रचारक असतील. ही लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात संविधानाची लढाई असल्याचा आरोप भुजबळांनी केला. छत्रपती शिवरायांनी आणि राजमाता जिजाऊ यांनी रयतेचं, लोकशाहीचं राज्य केलं. मात्र भाजप सरकार काय खायचं, प्यायचं आणि लिहायचं हे ठरवत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

लेखिका नयनतारा सहगल यांच्यावर राज्य कारभाराचा दबाव आणला. सरकार असंवेदनशीलता असल्याचं लिखाण केल्याने दबाव आणल्याचा आरोप भुजबळांनी केला. भाजप सरकार संवेदनावर घाला आणत असून लोकशाहीचं सरकार नसल्याचा आरोप भुजबळांनी केला.

सध्या मोदी विकासावर काहीच बोलत नाहीत. विकास भकास झाला असून नोटाबंदी ते राफेलपर्यंत सरकार फेल गेल्याची टीका भुजबळांनी केली. मराठा आरक्षण, सवर्ण आरक्षण हे निवडणूक जुमला आहे. आता ओबीसीत आरक्षणात पाच याचिका दाखल झाल्या. मात्र सरकारने विरोध करायला हवा होता. पण तो झाला नसल्याने आरक्षण राहील की जाईल, अशी चिंता भुजबळांनी व्यक्त केली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...