AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिहार निवडणुकीत आम्ही 20 ते 22 जागा जिंकू, प्रकाश आंबेडकरांचा दावा

बिहार निवडणुकीमध्ये आम्ही 20 ते 22 जागा जिंकू, असा दावा वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

बिहार निवडणुकीत आम्ही 20 ते 22 जागा जिंकू, प्रकाश आंबेडकरांचा दावा
| Updated on: Nov 08, 2020 | 11:19 PM
Share

अकोला : बिहारच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान शनिवारी पार पडलंय. त्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये बिहारमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. अशातच बिहार निवडणुकीमध्ये आम्ही 20 ते 22 जागा जिंकू, असा दावा वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. (We Will now 20-22 Seats in bihar Says prakash Ambedkar)

“आमच्या प्रोग्रेसिव्ह डेमोक्रेटिक अलायन्सने विकासाला केंद्रबिंदू मानून प्रचारात वास्तव मुद्द्यांवर भर दिला. आमच्यामुळेच बिहारची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आली, असं सांगताना बिहारमध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. बिहार विधानसभेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल”, असं भाकितही त्यांनी यावेळी वर्तवलं.

“बिहार निवडणुकीमध्ये पंतप्रधान मोदींचं भाषण दाखवलं पण मोदींच्या सभेची गर्दीचं दाखवली नाही. कारण शब्दांनी लोकांचं पोट भरत नाही. लोकं हाताला काम मागतात हे आता भाजपला आता कळालं आहे. समाजातील राजकीय आणि वैचारिक घुसळणीला बिहारच्या निवडणुकीने सुरुवात झाली आहे, असंही आंबेडकर म्हणाले.

“बिहार निवडणुकीमध्ये कुणालाही बहुमत मिळेल, अशी परिस्थिती नाही. निवडणुकीअगोदर एकीबरोबर लग्न कारायचं आणि निवडणुकीनंतर मैत्रिणीबरोबर पळून जायचं असं बिहारमध्ये होईल”, अशी भविष्यवाणी त्यांनी वर्तवली आहे. महाराष्ट्रात जसं घडलं तसं बिहारमध्येही घडेल का? पत्रकारांच्या या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘तिथे काय होईल मी सांगितलंय, मी कम्पेअर करणार नाही’.

मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावर सत्ताधारी विरुद्ध भाजप असा जोरदार संघर्ष सुरु असताना आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांना खोचक सवाल विचारला आहे. राज्यात आता जवळपास सर्व गोष्टी सुरु झाल्या आहेत. पण मंदिरं अद्याप सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिलेली नाही. त्यावरुन भाजपची आध्यात्मिक आघाडीही जोरदार आंदोलन करत आहे. त्यात आता प्रकाश आंबेडकरांनीही मंदिराच्या मुद्द्यावर सरकारला प्रश्न विचारलेत.

संबंधित बातम्या

“आचार्य उद्धव ठाकरे मंदिरं कधी सुरु करणार?” प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.