AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“आचार्य उद्धव ठाकरे मंदिरं कधी सुरु करणार?” प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल

"आचार्य उद्धव ठाकरे, आचार्य अजित पवार आणि आचार्य बाळासाहेब थोरात मंदिरं कधी सुरु करणार आहात? आचार्य आणि हभप यांचं वाकडं आहे का?" हभप यांनी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतलं म्हणून यांना राग आला आहे का? असे प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारले आहेत.

आचार्य उद्धव ठाकरे मंदिरं कधी सुरु करणार? प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल
| Edited By: | Updated on: Nov 08, 2020 | 5:59 PM
Share

अकोला: मंदिरं सुरु करण्याच्या मुद्द्यावर सत्ताधारी विरुद्ध भाजप असा जोरदार संघर्ष सुरु असताना आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांना खोचक सवाल विचारला आहे. राज्यात आता जवळपास सर्व गोष्टी सुरु झाल्या आहेत. पण मंदिरं अद्याप सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिलेली नाही. त्यावरुन भाजपची आध्यात्मिक आघाडीही जोरदार आंदोलन करत आहे. त्यात आता प्रकाश आंबेडकरांनीही मंदिराच्या मुद्द्यावर सरकारला प्रश्न विचारलेत. (Prakash Ambedkar criticize CM Uddhav Thackeray on temple issue )

“आचार्य उद्धव ठाकरे, आचार्य अजित पवार आणि आचार्य बाळासाहेब थोरात मंदिरं कधी सुरु करणार आहात? आचार्य आणि हभप यांचं वाकडं आहे का?” हभप यांनी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतलं म्हणून यांना राग आला आहे का? असे प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारले आहेत. त्याचबरोबर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याची, कोरोनाबाबत तात्पुरती रुग्णालये उभी करण्याची ताकद मंदिर संस्थांमध्ये आहे, असा दावाही आंबेडकर यांनी केला आहे.

राज्यातील सर्व मोठ्या मंदिरांनी सरकारला एक ऑफर दिली होती, अशी माहितीही आंबेडकरांनी दिली आहे. ‘भाविकांसाठी मंदिरं सुरु करा, आम्ही चाचणी करतो. कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी मंदिरांची असेल. सरकार सांगेल तिथे कोविड सेंटर उभे करण्याची तयारी मंदिरांनी दाखवली होती, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरला विठ्ठल-रुख्मिणी मंदिरावर वारकरी मोर्चा काढण्यात आला होता. राज्यातील सर्व मंदिरं सुरु करा अशी मागणी त्यावेळी करण्यात आली होती. पण राज्य सरकारने अद्याप मंदिरं सुरु करण्याबाबत निर्णय घेतलेला नाही. त्यावरुन आंबेडकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सहकारमंत्र्यांना खोचक प्रश्न विचारले आहेत.

मंदिरं, प्रार्थनास्थळांबाबत दिवाळीनंतर नियमावली

राज्यातील धार्मिकस्थळं दिवाळीनंतर उघडणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. पुढच्या आठवड्यात दिवाळी आहे. दिवाळीनंतर धार्मिकस्थळं उघडण्यासाठी नियमावली तयार करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मंदिरं उघडल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांवर गंडांतर येऊ नये म्हणून सावध पावलं टाकत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

धार्मिकस्थळं उघडणार, दिवाळीनंतर नियमावली करणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

पुरोगामी असलेले महाराष्ट्र सरकार हे आता प्रतिगामी व्हायला लागलंय : प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar criticize CM Uddhav Thackeray on temple issue

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.