AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुरोगामी असलेले महाराष्ट्र सरकार हे आता प्रतिगामी व्हायला लागलंय : प्रकाश आंबेडकर

पुरोगामी असलेले महाराष्ट्र सरकार हे आता प्रतिगामी व्हायला लागलंय, अशी टीका वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.

पुरोगामी असलेले महाराष्ट्र सरकार हे आता प्रतिगामी व्हायला लागलंय : प्रकाश आंबेडकर
| Updated on: Oct 15, 2020 | 4:24 PM
Share

पाटणा : “पुरोगामी असलेले महाराष्ट्र सरकार हे आता प्रतिगामी व्हायला लागलंय. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन उठवताना केंद्राने काही गाईडलाईन दिल्या होत्या, त्यादेखील मान्य करायला महाराष्ट्र सरकार तयार नाही. त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती इतर राज्यांच्या तुलनेत बिकट होत चालली असून महाराष्ट्र सरकारने बेभरवशावर न राहता निर्णय घेणारे राज्य म्हणून पुन्हा लौकिक मिळवावा”, असं वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. (Prakash Ambedkar Slam Uddhav thackeray Government)

“लॉकडाऊन नंतर इतर राज्यांची आर्थिक परिस्थिती महाराष्ट्रापेक्षा चांगली आहे. इतर राज्यांनी लॉकडाऊन उठवताना केंद्राच्या गाईडलाईनचा आधार घेतला होता. मात्र महाराष्ट्र सरकार केंद्राच्या गाईडलाईन्स मान्य करायला तयार नाही”, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर केली आहे.

“शिवाय महाराष्ट्र सरकारने अद्यापही लॉकडाऊन पूर्णपणे उठविला नाही. राज्यातील मंदिरं बंद असल्याने स्थानिक लोकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे बेभरवशावर न राहता पुरोगामित्व निर्णय घेणारे राज्य उभं करावं”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “महाराष्ट्र सरकार हे अगोदर पुरोगामी सरकार होतं. परंतु आता ते हळूहळू प्रतिगामी व्हायला लागलंय. केंद्राच्या गाईडलाईन्स महाराष्ट्र शासन मान्य करायला का तयार नाहीये? इतर राज्यांनी मंदिरं खुली करण्याचा निर्णय घेतलाय मात्र महाराष्ट्र सरकारने अजूनही मंदिरं खुली करण्याचा निर्णय घेतला नाही. मंदिरं बंद असल्याने स्थानिक लोकांचे नुकसान होत आहे. शासनाने लवकरात लवकर निर्णय घेणं अपेक्षित आहे.”

राज्याची आर्थिक स्थिती कशी सुधारेल हे सरकारने पाहिलं पाहिजे. मात्र सरकार या दिशेने कोणतीही पावलं टाकताना दिसून येत नाही. त्यामुळे बेभरवशावर न राहता पुरोगामित्व निर्णय घेणारे राज्य उभं करावं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

(Prakash Ambedkar Slam Uddhav thackeray Government)

संबंधित बातम्या

प्रकाश आंबेडकर बिहार विधानसभेच्या मैदानात!, ‘प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक आघाडी’सोबत हातमिळवणी

महाराष्ट्रात सॉफ्ट आणि हार्ड हिंदुत्वाची लढाई: प्रकाश आंबेडकर

उदयनराजेंवर प्रकाश आंबेडकरांची टीका, संभाजी भिडेंची प्रतिक्रिया काय?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.