AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shahaji Patil : उद्धव ठाकरेंविषयी सर्वांना आदर, पण भावना एकच आता आम्ही जगत नाही, असं का म्हणाले शहाजी बापू पाटील

आ. शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्याला बंडाबाबतचा सर्व इतिहासच सांगितला आहे. गेल्या अनेक दिवसांपासूनची खदखद ही आमदारांनी एकनाथ शिंदे यांना बोलून दाखवली आणि तेथूनच या निर्णयापर्यंत सर्वजण पोहचले आहेत. त्याच अनुशंगाने आता सुरतमध्ये पहिले पाऊल हे शंभुराजे राजे देसाई आणि शहाजी पाटील या दोघांनी टाकले होते. तेव्हाच मोहिम फत्ते झाली अशी आमची भावना झाली होती.

Shahaji Patil : उद्धव ठाकरेंविषयी सर्वांना आदर, पण भावना एकच आता आम्ही जगत नाही, असं का म्हणाले शहाजी बापू पाटील
आ. शहाजी बापू पाटील
| Updated on: Jun 24, 2022 | 12:35 PM
Share

मुंबई :  (Issue of Hindutva) हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करुन (Eknath Shinde) एकनाथ शिंदे शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंडाचे अस्त्र हातामध्ये घेतले असले तरी यामागे अनेक कारणे आता समोर येऊ लागली आहेत. यामधले प्रमुख कारण म्हणजे महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेले (Shivsena) शिवसेनेचे मित्र पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस. गेल्या अडीच वर्षाच्या काळात शिवसेनेच्या वाटेचं याच पक्षातील आमदार खात आहेत. आणि हे असंच राहीलं तर उद्या निवडणुकीत राष्ट्रवादी हेच शिवसेनेचे मतदार संघ आपल्या ताब्यात घेईल ही सर्वच आमदारांच्या मनात भीती आहे. त्यामुळे या बंडाला सुरवात झाली आहे. आणि प्रत्येक आमदाराच्या मनातली खदखद ही एकनाथ शिंदे यांनी ओळखली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आजही प्रत्येकाच्या मनात आदर असला तरी या बाबींचा अडसर होत असल्याचे आ. शहाजी बापू पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्याला फोनवरुन सांगितले आहे. सध्या ती ऑडिओ क्लिप राज्यभर व्हायरल होत आहे.

सुरतमध्ये पहिले पाऊल कुण्या आमदाराचे?

आ. शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्याला बंडाबाबतचा सर्व इतिहासच सांगितला आहे. गेल्या अनेक दिवसांपासूनची खदखद ही आमदारांनी एकनाथ शिंदे यांना बोलून दाखवली आणि तेथूनच या निर्णयापर्यंत सर्वजण पोहचले आहेत. त्याच अनुशंगाने आता सुरतमध्ये पहिले पाऊल हे शंभुराजे राजे देसाई आणि शहाजी पाटील या दोघांनी टाकले होते. तेव्हाच मोहिम फत्ते झाली अशी आमची भावना झाली होती. आता दिवसेंदिवस आमदारांची संख्या वाढत असली तरी बंडाला सुरवात आमच्यापासूनच झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे लढाई शंभर टक्के जिंकणार असा विश्वास प्रत्येकाला आला आहे.

मतदारसंघाबाबत होता धोका

सध्या शिवसेनेची सत्ता असून विकास कामांसाठी निधी आणण्यात अडचण निर्माण होत असत. सर्वकाही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून होत असताना त्याचा भविष्यात मोठा परिणाम होणार याची प्रत्येकालाच चुणूक लागली होती. गेल्या अडीत वर्षापासून शिवसेनेचे आमदार हे मुख्यमंत्री पदी उध्दव ठाकरे असताना सहन करीत आहे. उद्या निवडणुकांमध्ये हे राष्ट्रवादीवाले मतदारसंघ देखीव ठेवतील का नाही अशी भावना प्रत्येकाची झाली आहे. त्यामुळे आम्ही जगतोत की नाही असे प्रत्येकाला वाटत आहे. ती वेळ येण्यापूर्वीच हे पाऊल उचलणे गरजेचे आहे. त्यामुळे आता सर्वकाही सुरळीत होणार असल्याचा विश्वास शहाजी बापूंनी आपल्या कार्यतर्त्याला दिला आहे.

मतदार संघाबाबत चिंता

या नाराज आमदारांना भविष्यात आपले मतदारसंघ तरी आपल्यासाठी राहणार की नाही याची धास्ती लागली होती. एकंदरी महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वाढत असलेले महत्व आणि शिवसेनेचे दुय्यम स्थान हे अनेकांच्या जिव्हारी लागले आहे. त्यामुळेच या स्टेपला सर्वकाही येऊन ठेपले आहे. हे काही का असेना पण आता आमदारही आपआपल्या मतदार संघाचा विचार करु लागले आहेत. यामधून एक चांगल घडलं म्हणजे सांगोला मतदार संघाचा कायापालट करण्याची संधी या माध्यमातून मिळणार असल्याचे शहाजी बापू यांनी सांगितले आहे.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.